करोना संसर्ग रोखण्याचा केरळ पॅटर्न नेमका आहे कसा? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, March 24, 2021

करोना संसर्ग रोखण्याचा केरळ पॅटर्न नेमका आहे कसा?

https://ift.tt/3rlcN0t
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई केरळमध्ये संसर्गाचे प्रमाण सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान सर्वोच्च होते, मात्र त्यानंतर ते उतरणीला लागून आता प्रतिदिवशी एक हजार ते दोन हजार रुग्णसंख्येपर्यंत आले आहे. संसर्ग रोखण्यासाठी केरळमधील वैद्यकीय तज्ज्ञांनी करोना आणि करोनापश्चात कालावधीमध्ये काही महत्त्वाच्या बाबींचे पालन केले. त्यामुळे प्रादुर्भाव रोखणे शक्य झाल्याचे केरळमध्ये करोना संसर्गाच्या नियोजनामध्ये प्रत्यक्ष सहभागी असलेल्या तसेच केरळच्या वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ यांनी 'मटा'ला सांगितले. करोनामुक्त झाल्यानंतर डॉ. कुमार यांनाही हृदयविकाराचा झटका आला होता, त्यातून बरे झाल्यानंतर ते पुन्हा वैद्यकीय सेवेत रुजू झाले आहेत. प्रवाशांच्या चाचण्या, ते करोना पॉझिटिव्ह असल्यास त्यांचे विलगीकरण, त्यानंतर वैद्यकीय उपचार, प्रवासाच्या संदर्भात पाळलेले कडक नियम, मास्क तसेच सुरक्षित वावराच्या निकषाचे पालन करण्यासह कोविडपश्चात उपचारपद्धतीमध्ये कोणत्या प्रकारचा त्रास होऊ शकतो, याचाही सूक्ष्म अभ्यास करण्यात आला. डॉ. संतोष यांनी सांगितले की, केरळमध्ये कोणत्याही प्रकारे सार्वजनिक नियमांचे उल्लंघन करण्याची हिंमत लोक करत नाहीत. तसे झाल्यास कडक कारवाई होऊ शकते याचीही त्यांना पूर्ण कल्पना आहे. संसर्ग वाढल्यानंतर होणाऱ्या त्रासांची त्यांना पूर्ण कल्पना आहे. मुंबईमध्ये रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्याची कल्पना त्यांना आहे. जेव्हा करोना संसर्गाचे प्रमाण ऑक्टोबर महिन्यानंतर उतरणीला लागले तेव्हा गाफील न राहता राज्याने आयसीयूची क्षमता वाढवणे, खाटांचे नियोजन करणे, अतिरिक्त खाटांची तयारी ठेवणे, कोविड रुग्णालयामध्ये नॉन कोविड क्षमता उपलब्ध करत असताना रुग्णसंख्या खाली आल्यानंतरही कोविडच्या वैद्यकीय उपचारांच्या दृष्टीने नियोजन ठेवण्यात आले होते. लोकसहभाग हा संपूर्ण लढाईमधील सर्वांत महत्त्वाची बाब असल्याचे डॉ. संतोष आवर्जून सांगतात. सामान्यांच्या सहभागाशिवाय व त्यांना योग्य प्रकारच्या प्रशिक्षणाशिवाय हे शक्य नाही, हे त्यांना जाणवले. गेल्या वर्षी केरळहून ज्या डॉक्टरांचे पथक मुंबईमध्ये करोना काळामध्ये काम करण्यासाठी आले होते, त्यातील काही डॉक्टर अद्यापही मुंबईमध्ये आहेत. त्यांच्याकडून हे अपडेट मिळत असतात. मुंबईमध्ये करोना संसर्गाच्या लक्षणांमध्ये बदल झालेला दिसला तरीही केरळमध्ये विषाणूच्या प्रकारामध्ये अद्याप म्युटेशन झालेले दिसत नाही, असा दावा त्यांनी केला आहे. मुंबईतील संख्या वाढली तर तेथील डॉक्टरांची मुंबईला पुन्हा येण्याची तयारी आहे, मात्र यावेळी खासगी डॉक्टरांऐवजी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमधील डॉक्टरांना गरज पडल्यास व विचारणा झाल्यास मदतीसाठी पाठवता येईल, असे डॉ. संतोष यांनी सांगितले. लशींची तिथेही कमतरता विषाणूचे वर्तन, संसर्गाचा वेग आणि संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी घ्यायची काळजी या पातळ्यांवर आम्हीही मुंबईकडून काही गोष्टी शिकलो. केरळकडून इतर राज्यांनी प्रेरणाही घेतली आहे. येथे कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लशींना मिळणारा प्रतिसाद चांगला असला तरीही लशींच्या मर्यादित उपलब्धतेचा अडसर सध्या आहे. हा प्रश्न सुटला तर लसीकरणाच्या प्रक्रियेला गती देता येईल, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला.