इम्रान खान यांचे विरोधक म्हणाले, पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतालाच बोलवू! - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, July 26, 2021

इम्रान खान यांचे विरोधक म्हणाले, पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतालाच बोलवू!

https://ift.tt/3iRg1XH
इस्लामाबाद: पाकिस्तानने रविवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणुका उरकण्याचा फार्स केला. या निवडणुकीमध्ये अपेक्षेप्रमाणे गैरप्रकारांचे अनेक आरोप झाले असून, या भागात झालेल्या हिंसाचारामध्ये पंतप्रधान इम्रान खान यांच्या तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाच्या दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. सत्ताधाऱ्यांच्या हिंसाचारानंतर विरोधी उमेदवारांनी भारतालाच बोलावू असे म्हटले. इम्रान खान यांच्यावर निशाणा साधताना तुमच्यापेक्षा भारत चांगला असून कमीत कमी मतदाना दरम्यान हिंसाचार तरी करत नाहीत, असेही विरोधकांनी सुनावले. कोटली जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर तेहरिक-ए-इन्साफ आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षात दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. तर, अज्ञात व्यक्तींच्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. अन्य एका घटनेमध्ये जमाते इस्लामीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच पोलिस जखमी झाले. निवडणूक अधिकारी रशिद सुलेहरिया यांनी या हिंसाचाराचा निषेध केला आहे. वाचा: हिंसाचाराच्या काही घटनांनंतर अनेक केंद्रांवरील मतदानाची प्रक्रिया थांबवण्यात आली होती. तर, अनेक ठिकाणी पोलिसांनी नागरिकांना ताब्यात घेतले होते. अनेक जण हिंसाचारात जखमी झाल्याचेही सांगण्यात येते. अनेक ठिकाणी हिंसाचाराचा अंदाज असल्यामुळे लष्कर तैनात करण्यात आले होते. तेहरिक-ए-इन्साफचे कार्यकर्ते मतदानाच्या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत होते, असा आरोप पाकिस्तान पीपल्स पक्षाने केला आहे. तर, मतदानातील गैरप्रकार उघडकीस आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावर कायम राहावे, असे आवाहन पाकिस्तान मुस्लीम लीगच्या उपाध्यक्ष मरियम नवाझ यांनी केले होते. वाचा: पाक सरकारच्या दाव्यानुसार, पाकव्याप्त काश्मीरच्या विधानसभेमध्ये ५३ सदस्य असून, त्यापैकी ४५ सदस्य थेट निवडणुकीतून निवडले जातात. या निवडणुकीत पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय), पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) आणि ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ (पीपीपी) या पक्षांमध्ये तिरंगी लढत होती. वाचा: निवडणुकीला भारताचा विरोध पाकिस्तानने या आधी गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये निवडणुका घेतल्याचा देखावा केला होता. त्यानंतर आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये फार्स केला आहे. निवडणुका घेण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयावर भारताने यापूर्वीच टीका केली आहे. लष्कराने ताब्यात घेतलेल्या भागात बदल करण्याची कोणतीही कृती बेकायदा असल्याकडे भारताने लक्ष वेधले आहे. इम्रान खान यांच्या पक्षाला काठावर बहुमत फार्स ठरलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधील निवडणुकीची निकालही घोषित करण्यात आले. पंतप्रधान इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इन्साफला (पीटीआय) काठावरचे बहुमत मिळाले. पीटीआयने २५ जागांवर विजय मिळवला. तर, बिलावल भुट्टो यांच्या पीपीपी पक्षाला ९ आणि मरियम नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाला ६ जागा मिळाल्यात आहेत. जम्मू-काश्मीर पीपल्स पार्टी आणि काश्मीर मुस्लिम कॉन्फरसलादेखील प्रत्येकी एका जागेवर विजय मिळाला आहे.