तालिबानची भारताला धमकी, अफगाणिस्तानमध्ये लष्कर पाठवल्यास... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, August 14, 2021

तालिबानची भारताला धमकी, अफगाणिस्तानमध्ये लष्कर पाठवल्यास...

https://ift.tt/37GTVSp
काबूल: अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज करण्यासाठी सरसावलेल्या तालिबानने भारताला धमकी दिली आहे. अफगाणिस्तानमध्ये भारतीय लष्कर दाखल झाल्यास त्याचे परिणाम चांगले होणार नसल्याचे तालिबानने म्हटले आहे. लष्करी हस्तक्षेप करण्याआधी भारताने दुसऱ्या देशांची झालेली परिस्थिती पाहावी असेही तालिबानने म्हटले आहे. विशेष म्हणजे अफगाणिस्तानमध्ये भारताने केलेल्या विकास कामांबद्दल तालिबानने कौतुकही केले आहे. तालिबानचे प्रवक्ते मोहम्मद सुहेल शाहीनने वृत्तसंस्था एएनआयला मुलाखत दिली. शाहीनने म्हटले की, भारत आपल्या सैन्याला अफगाणिस्तानमध्ये पाठवणार असेल आणि भारतीय सैन्य कायम इथेच राहणार असेल तर त्यांच्यासाठी चांगले राहणार नाही. अफगाणिस्तानमध्ये असलेल्या इतर देशांच्या सैनिकांची काय अवस्था झाली हे भारताने पाहिले असेल. शाहीनने पुढे म्हटले की, भारताने अफगाणिस्तानला मदत केली आहे. त्याचे कौतुक केले आहे. तालिबानने केले भारताचे कौतुक शाहीनने म्हटले की, भारताने अफगाणिस्तानच्या नागरिकांसाठी धरण, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकल्प व इतर विकास कामे केली. अफगाणिस्तानच्या नागरिकांच्या आर्थिक संपन्नतेसाठी केलेल्या कामाचे आम्ही कौतुक करत आहोत. भारतीय शिष्टमंडळासोबत भेट झाली नसल्याचेही शाहीनने स्पष्ट केले. शाहीनने सांगितले की, कोणतीही बैठक झाली नाही. मात्र, दोहातील एका बैठकी दरम्यान भारताचे शिष्टमंडळ उपस्थित होते. अफगाणिस्तानमधील दूतावासांना धोका नाही शाहीनने म्हटले की, तालिबानकडून इतर देशांचे दूतावास, राजनयिकांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही. आम्ही कोणत्याही देशाच्या दूतावासाला अथवा अधिकाऱ्यांना लक्ष्य करत नाही. आम्ही हे वारंवार स्पष्ट केले आहे. निशाण साहिब शीख व्यक्तींनी काढले काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानमधील एका गुरुद्वारावरून शीख धर्मियांचा ध्वज निशाण साहिब हटवण्यात आले होते. तालिबानने हे कृत्य केल्याचा आरोप करण्यात येत होता. हे आरोप शाहीनने फेटाळून लावले. शाहीनने म्हटले की, शीख समुदायाने स्वत:हून तो झेंडा काढला होता. जेव्हा तालिबानी सुरक्षा अधिकारी त्या ठिकाणी गेले तेव्हा त्यांनी चौकशी केली. कोणी त्रास देऊ नये यासाठी झेंडा काढण्यात आला होता. तालिबानच्या लोकांनी समजूत काढल्यानंतर निशाण साहिब फडकवण्यात आला.