पहिल्याच दिवशी भारतीय संघाला अजून एक धक्का, गंभीर दुखापतीमुळे क्रिकेटपटूने मैदानत सोडले... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 26, 2021

पहिल्याच दिवशी भारतीय संघाला अजून एक धक्का, गंभीर दुखापतीमुळे क्रिकेटपटूने मैदानत सोडले...

https://ift.tt/3sKrj4g
हेडिंग्ले : कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय फलंदाजांनी हाराकिरी पत्करली, त्यानंतर गोलंदाजही अपयशी ठरले. पण क्षेत्ररक्षण करत असताना भारताचा आता एक मोठा धक्का बसला आहे. कारण महत्वाचा खेळाडू क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला आहे, त्याची ही दुखापत एवढी गंभीर होती की, त्याला मैदानातून बाहेर न्यावे लागले. तिसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारताचा संघ ७८ धावांवर ऑल आऊट झाला, तर इंग्लंडने बिनबाद १२० धावा केल्या आहेत. पण क्षेत्ररक्षण करत असताना रवींद्र जडेजाला गंभीर दुखापत झाली. ही दुखापत गंभीर असल्यामुळे त्याच्यावर मैदानात उपचार करणे शक्य नव्हते. त्यामुळेच त्याला मैदानाबाहेर जावे लागले. ही दुखापत किती गंभीर आहे आणि तो उद्या खेळणार की नाही, याबाबत भारतीय संघाने अधिकृत माहिती दिलेली नाही. पण जर जडेजा उद्या खेळला नाही तर या खेळपट्टीवर भारताला धक्का बसू शकतो. कारण खेळपट्टीही फलंदाजीला पोषक आहे आणि त्यावेळी जडेजा भेदक मारा करून धावांचा ओघ थांबवू शकतो. त्यामुळे जडेजा उद्या खेळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष असेल. भारतीय संघ कसा अपयशी ठरला, पाहा...भारताला पहिल्याच षटकात अँडरसनने हा धक्का दिला होता. त्याचबरोबर अँडरसनने त्यानंतर चेतेश्वर पुजाराला बाद करत भारताला दुसरा धक्का दिला. भारताने दोन्ही फलंदाज लवकर बाद झाल्यावर विराट कोहली आता कशी फलंदाजी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. पण अँडरसनने यावेळी अचूक आणि भेदक मारा केला आणि कोहलीला बाद करत भारताला तिसरा धक्का दिला. त्यामुळे भारताची ११व्या षटकात ३ बाद २१ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर काही काळ रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी काही धावा जमवल्या. पण उपाहारापूर्वी अजिंक्य रहाणे १८ धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्माकडून मोठी खेळीची भारतीय चाहत्यांना आशा होती. पण रोहितही यावेळी मोठी खेळी साकरण्यात अपयशी ठरला. रोहितने १०५ चेंडूंचा सामना केला खरा, पण त्याला एका चौकाराच्या मदतीने १९ धावाच करता आल्या. रॉरी बर्न्स आणि हसीब हमीद या दोघांनाही यावेळी अर्धशतक झळकावली आणि इंग्लंडला धडाकेबाज सुरुवात करून दिली. पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने बिन बाद १२०अशी मजल मारली. त्यामुळे इंग्लंडच्या संघाने पहिल्या दिवशी वरचष्मा राखला आहे.