मुंबई: येथे सातवी इयत्तेत शिकणाऱ्या आदिती दिपक जाधव या मुलीने राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तिला डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेतली रौप्य पदकाची २ हजार रुपयांची पारितोषिकाची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा केली आहे. या संकटकाळात आपणही काही तरी मदत करावी या भावनेने “खारीचा वाटा” उचलत असल्याचे मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्रात तिने म्हटले आहे. ( CM ) वाचा: आदिती जाधवने आपल्या मदतीचा धनादेश पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे नुकताच दिला होता. मुख्यमंत्र्यांना तिने लिहिलेले पत्र आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाचून दाखवण्यात आले. यावेळी सर्व मंत्र्यांनी एकमुखाने आदितीचे कौतुक केले. वाचा: पत्रात आदितीने म्हटले आहे की, नुकताच राज्यात महापूर येऊन गेला. या पूरग्रस्तांच्या मदतीची आपली धडपड पाहिली. यातून आपले नेतृत्व आणखी उठून दिसले. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण असं वाटलं. खरच अवघड आहे हे सगळं, आपले काम पाहून वाटायचं, आपण यात खारीचा वाटा उचलला पाहिजे, पूरग्रस्तांना मदत केली पाहिजे. मला माहीत आहे मी लहान आहे, पण मला डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत मिळालेली द्यावी असे वाटले आणि म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ही रक्कम जमा करत आहे. आदितीचे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष स्तुती केली. आदितीने दिलेली ही मदत अनमोल असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी तिला खूप सारे आशीर्वाद दिले आहेत तसेच तुम्ही बालमंडळीच या देशाचा भक्कम आधारस्तंभ असल्याचेही म्हटले आहे. वाचा: