समीर वानखेडे तपास अधिकारी नाहीत ते केवळ...; विशेष दक्षता पथकाच्या प्रमुखांचे स्पष्टीकरण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, October 29, 2021

समीर वानखेडे तपास अधिकारी नाहीत ते केवळ...; विशेष दक्षता पथकाच्या प्रमुखांचे स्पष्टीकरण

https://ift.tt/3CsaoHN
म. टा. प्रतिनिधी, 'आर्यन खान अमली पदार्थ प्रकरणात एनसीबी मुंबईचे प्रादेशिक संचालक तपास अधिकारी नाहीत. ते केवळ पर्यवेक्षण अधिकारी आहेत,' असे धक्कादायक स्पष्टीकरण या प्रकरणातील खंडणी आरोपासंबंधी चौकशी करणाऱ्या विशेष दक्षता पथकाचे प्रमुख ज्ञानेंद्रसिंह यांनी दिले आहे. या प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर सैल यांनी समीर वानखेडे यांनी अन्य साक्षीदार किरण गोसावी यांच्यामार्फत खंडणी मागितल्याचा आरोप करणारे शपथपत्र सामाजिक माध्यमांवर फिरवले आहे. त्या पार्श्वभूमीवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने ( एनसीबी) उत्तर क्षेत्राचे उपमहासंचालक ज्ञानेंद्रसिंह यांना विशेष दक्षता चौकशीसाठी मुंबईत पाठवले आहे. पथकाने बुधवारी वानखेडे यांची चार तास चौकशी केली. त्यानंतर गुरुवारी वानखेडे यांच्याबाबत वेगळेच स्पष्टीकरण दिले. 'आर्यन खान प्रकरणात व्ही. व्ही. सिंह तपास अधिकारी आहेत. वानखेडे यांच्या वरील स्तरावर क्षेत्रीय उपमहासंचालक आहेत. त्यांच्या वरच्या स्तरावर एनसीबीचे महासंचालक आहेत. त्यामुळे चौकशीचा अहवाल आम्ही महासंचालकांना सोपवू. या अहवालावर काय कार्यवाही करायची, तो निर्णय महासंचालक घेतील; पण या प्रकरणात अनेक नावे समोर येत आहेत. त्या सर्वांशी आम्हाला बोलायचे आहे. अनेक साक्षीदारांचा जबाब घ्यायचा असून त्यांची चौकशीही करायची आहे,' असे ज्ञानेंद्रसिंह म्हणाले. 'सैल आले का नाहीत?' 'आर्यन खान प्रकरणात प्रभाकर सैल यांनी खंडणीचा आरोप केला आहे. या आरोपानुसारच एनसीबीच्या दक्षता पथकाने वानखेडे यांची चौकशी सुरू केली आहे. त्यामुळेच सैल यांचा जबाब चौकशी पथकाला नोंदवायचा आहे. हे प्रकरण व त्यांनी केलेले आरोप नेमके काय आहेत, हे चौकशी पथकाला जाणून घ्यायचे आहे; पण सैल यांना चौकशीसाठी बोलावूनही ते पथकासमोर आले नाहीत. त्याबरोबरच गोसावी यांना पुण्यात अटक झाली आहे. त्यांचा जबाब आम्हाला हवा आहे,' असे ज्ञानेंद्रसिंह यांनी सांगितले.