मणिपूर हल्लाः 'कर्नल कुटुंबासोबत होते हे माहिती नव्हतं', अतिरेकी संघटनांचा दावा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 14, 2021

मणिपूर हल्लाः 'कर्नल कुटुंबासोबत होते हे माहिती नव्हतं', अतिरेकी संघटनांचा दावा

https://ift.tt/30kn0Tp
नवी दिल्लीः मणिपूरमध्ये शनिवारी लष्कराच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी मणिपूर पीएलएने आणि मणिपूर नागा पीपल्स फ्रंट (MNPF) यांनी स्वीकारली आहे. आपल्या हल्ल्यात आसाम रायफल्सचे कर्नल आणि त्याच्या कुटुंबासह ७ जण मारले गेले, असं दोन्ही अतिरेकी संघटनांनी जारी केलेल्या एका पत्रकातून दावा केला आहे. कर्नलची पत्नी आणि मुलगा त्यांच्यासोबत पथकात होते याची कल्पना नव्हती, असं अतिरेकी संघटनांनी म्हटलं आहे. सुरक्षा दलांसाठी धोक्याची घंटा हल्ला भीषण अतिरिकी संघटनांनी अतिशय सुनियोजित पद्धतीने केला होता. म्यानमारमध्ये AK-47 असॉल्ट रायफल, मशीन गन, अँटी-टँक माइन्स आणि ग्रेनेड्स यांसारखी अवैध चिनी बनावटीची शस्त्रे येत आहेत. सीमेवरील बंडखोर संघटनांना त्यांची मदत होत आहे. भारतीय सुरक्षा दलांसाठी ही घटना धोक्याची घंटा आहे, असं भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं. म्यानमार सीमेवरून भारतात घुसखोरीची शक्यता कुटुंबातील सदस्यांनाही लक्ष्य करण्यात आलेली अशी घटना उत्तर-पूर्वेमध्ये बऱ्याच काळानंतर घडली आहे. सर्व बंडखोरांनी म्यानमार सीमेवरून भारतात घुसखोरी केली असावी. या हल्ल्यामुळे सर्वसाधारणपणे ईशान्येतील बंडखोर गटांशी सामना करण्याच्या रणनीतीचा पुनर्विचार करावा लागेल, असं भारतीय लष्कराच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटलंय. अतिरेकी घात घालून बसले होते भारतीय सुरक्षा दलांनी अशा अशांत भागात आपल्या कुटुंबीयांना सोबत आणू नये, असे दहशतवादी संघटनांनी म्हटले आहे. मणिपूरच्या चुराचंदपूर जिल्ह्यातील सियालसी गावाजवळ शनिवारी लष्कराच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बिप्लब त्रिपाठी हे बिहंग को-पोस्टवरून परतत असताना सकाळी ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात कर्नल बिप्लबसह त्यांची पत्नी अनुजा आणि पाच वर्षांचा मुलगा अबीर यांचाही मृत्यू झाला. चुराचंदपूर जिल्ह्यातील सिंगत उपविभागात झालेल्या हल्ल्यात चार जवानही शहीद झाले. कर्नल बिप्लब त्रिपाठी नेहमीप्रमाणे चेक पोस्टची पाहणी करण्यासाठी बाहेर पडले होते. हा त्याच्या दिनक्रमाचा भाग होता. पण शनिवारी त्यांचे कुटुंबही सोबत होते. अतिरेक्यांनी आधी स्फोट केला आणि नंतर गोळीबार केला. त्यांच्यासोबत पत्नी अनुजा आणि मुलगाही गाडीत होते. या हल्ल्यात संपूर्ण कुटुंबाची हत्या करण्यात आली. ताफ्यातील पहिली गाडी स्फोटाने उडवली कमांडिंग ऑफिसर कर्नल बिप्लब त्रिपाठी यांच्या ताफ्यातील पहिली गाडी स्फोटाने स्फोटाने उडवण्यात आली. यावेळी कर्नल त्रिपाठी पत्नी आणि मुलासोबत होते. स्फोटानंतर अतिरेक्यांनी उरलेल्या दोन्ही वाहनांवर गोळीबार सुरू केला. यात कर्नल बिप्लब त्रिपाठी आणि त्यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.