'हे लावालावी करायचं काम...'; नारायण राणे यांचा संजय राऊत यांच्यावर घणाघात - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 12, 2021

'हे लावालावी करायचं काम...'; नारायण राणे यांचा संजय राऊत यांच्यावर घणाघात

https://ift.tt/3oJ4Kga
सिंधुदुर्ग: केंद्रीय मंत्री (Narayan Rane) यांनी शिवसेनेचे खासदार (Sanjay Raut) यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. संजय राऊत हे शिवसेनेचे आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसचे?, असा सवाल उपस्थित करतानाच दिल्लीत ते शरद पवार यांच्याच कार्यालयात असतात. जसे ते दाखवतात तसे ते नाहीत. हे लावीलावी करायचं काम... त्याचं नाव संजय राऊत, अशा शब्दांत राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. (union minister criticizes mp in sindhudurg) नारायण राणे पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपने देशातील ऐक्य तोडण्याचे काम केले असे संजय राऊत यांनी म्हटले आहे, त्यावर आपली प्रतिक्रिया काय असा प्रश्न राणे यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना राणे म्हणाले की, देशात सत्ता असताना भाजपने ऐक्य भंग केलं नाही. पण काही लोक गुपचूप हे काम करत असतात. संजय राऊत हे राष्ट्रवादीत आहेत की शिवसेनेत आहेत तेच कळत नाही. त्यांचे नेते कोण, शरद पवार की उद्धव ठाकरे? दिल्लीत पवार साहेबांच्याच कार्यालयात ते असतात. पक्षाशी त्यांची निष्ठा नाही. ते पक्षाशी प्रामाणिक नाहीत. ते आव आणायचं काम करत आहेत. ते दाखवतात तसे ते नाहीत. ते जसं बोलतात तशा भाषेत वृत्तपत्राचा संपादक अशा भाषेत बोलू शकत नाही. त्यांची भाषा मार्गदर्शक नाही, लोकांचे प्रबोधन करणारी नाही, विकासात्मक नाही. त्या विषयांवर ते बोलतच नाहीत. जे केले नाहीत शिवसेनेत ते सांगत आहेत. ते कधी होते शिवसेनेत? काय केलं?... हे लावालावी करायचं काम, त्याचं नाव संजय राऊत. क्लिक करा आणि वाचा- राज्य सरकारवर राणे यांची टीका यावेळी त्यांनी राज्यातील ठाकरे सरकारवरही हल्लाबोल केला. एका प्रश्नाला उत्तर देताना राणे म्हणाले की, राज्याती आताच हे सरकार चालत नाहीए. एसटी कामगारांचा प्रश्न हे सरकार सोडवू शकत नाही. राज्याचा विकास रखडला आहे. नगरपंचायततीच्या निवडणुकीच काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नाही, असे राणे म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- 'मुंबई महापालिकेत सत्ताबदल दिसणार' मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्ताबद्दल दिसणार असल्याचे भाष्य राणे यांनी केले आहे. मी ५५ वर्ष राजकारणात आहे. आघाडी सरकारमधील तीन्ही पक्षांना कुठलीच निवडणूक नको आहे. लोक त्यांना निवडून देणार नाहीत हे त्यांना माहिती आहे. त्यामुळेच त्यांना निवडणुका नको आहोत आणि त्या पुढे ढकलल्या जातायत,असे राणे यांनी म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा-