असदुद्दीन ओवेसी यांचा ठाकरे सरकार हल्लाबोल, म्हणाले, 'मुस्लिमांचा फक्त...' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 12, 2021

असदुद्दीन ओवेसी यांचा ठाकरे सरकार हल्लाबोल, म्हणाले, 'मुस्लिमांचा फक्त...'

https://ift.tt/3pHcVbS
मुंबई: मुंबईतील चांदिवली येथे पार पडलेल्या तिरंगा रॅलीत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (AIMIM) प्रमुख खासदार (Asaduddin Owaisi) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Govt) जोरदार हल्लाबोल केला. मुस्लिमांना त्यांच्या हक्काचे आरक्षण देण्यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार गंभीर नसल्याचा आरोप ओवेसी यांनी केला. या आघाडीने मुस्लिमांचा वापर केवळ एक वोटबँक म्हणूनच केला आणि या बदल्यात मुस्लिमांना धोकाच मिळाला, असा घणाघाती आरोप ओवेसी यांनी आघाडी सरकारवर केला. ( chief criticizes over in mumbai tiranga rally) शिवसेना नेहमीच राष्ट्रवादची घोषणा २४ तास देत असते. मात्र तिरंगा हीच तर राष्ट्रवादाची ओळख आहे हे शिवसेना विसरली आहे. हा तिरंगा घेऊन येणाऱ्या मोर्चाला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. हा तिरंगा ही राष्ट्रवादाची ओळखही आहे आणि आमच्या कुर्बानीची कहाणी देखईल आहे. आमच्या जेष्ठांची निशाणीही आहे, असे सांगतानाच मला हे कळत नाही की आपण तिरंग्याच्या विरोधात कसे काय असू शकता?, असा सवालही ओवेसी यांनी विचारला. राहुल गांधी येतील तेव्हाही ओमिक्ऱन असेल की त्यांचे फुलांनी स्वागत कराल? मला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे () यांना विचारायचे आहे की, राहुल गांधी मुंबईत आल्यावर ओमिक्रॉनचे नाव घेतले जाईल, कलम १४४ लागू केले जाईल की त्यांचे स्वागत फुलांनी केले जाईल? असा सवाल खासदार इम्तियाज जलील यांना अडवण्यावरून ओवेसी यांनी सरकारला विचारला. त्यांना जेवण बनवण्यासाठी सर्वकाही मदत करा आणि जेव्हा अन्न शिजवले जाईल तेव्हा हे दात दाखवतील आणि तुमची मुले उपाशी झोपतील. तुम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मतदान केले. मला सांगा काय झाले? ओवेसी मते कापतील असा मुस्लिमाने विचार केला आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मतदान केले. आज दोघेही जाऊन शिवसेनेच्या मांडीवर बसले, असे सांगत मुस्लिम किती फसत राहणार आहे?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. धर्मनिरपेक्षतेमुळे मुस्लिमांना काय मिळाले? निवडणुका आल्या की हे लोक धर्मनिरपेक्षता... धर्मनिरपेक्षता असे म्हणायला सुरुवात करतात. काय मिळाले या धर्मनिरपेक्षतेने?, आरक्षण मिळाले का?, हक्क मिळाला का?, न्याय मिळाला का?, असे म्हणत मी राजकीय धर्मनिरपेक्षतेला मानत नाही, तर मी भारतीय राज्यघटनेत लिहिलेल्या धर्मनिरपेक्षतेला मानतो, असे ओवेसी म्हणाले.