मोदी सरकारला मोठा धक्का! शक्तीशाली देशांच्या यादीत भारताची ताकद घटली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, December 13, 2021

मोदी सरकारला मोठा धक्का! शक्तीशाली देशांच्या यादीत भारताची ताकद घटली

https://ift.tt/3GBEj1Y
सिडनी, : नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आशियातील सर्वाधिक शक्तिशाली देशांच्या यादीत भारतातील नरेंद्र मोदी सरकारला मोठा धक्का बसलाय. या यादीत भारताला २ गुणांचं नुकसान सहन करावं लागल्याचं दिसतंय. मात्र, या यादीत भारताचं गेल्या वर्षीचं चौथं स्थानं कायम आहे. उल्लेखनीय म्हणजे, सिडनीच्या ''कडून ''च्या यादीत 'अमेरिके'ला पहिलं स्थान देण्यात आलंय. करोना विषाणूच्या संसर्गामुळे आणि लॉकडाऊनमुळे आणि या दोन्ही देशांनी यावर्षी आशिया पॅसिफिक क्षेत्रात आपली पकड सैल केल्याचा निष्कर्ष या संस्थेनं काढलाय. या अहवालात , चीन आणि जपाननंतर भारताचा क्रमांक लागतो. भारताला २०२० च्या तुलनेत यावर्षी दोन गुणांचं नुकसान झालंय तर चीनला १.५ गुणांचा फटका बसलाय. करोना संसर्गाचा फटका अमेरिका, जपान आणि चीननंतर भारत हा चौथा सर्वात शक्तिशाली देश कोविड संसर्गानं सर्वाधिक प्रभावित झालेल्या देशांपैकी एक असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. देशात कोविडपूर्व काळापासून आताची स्थिती डगमगलेली दिसून येतेय. अहवालानुसार, गेल्या एका वर्षात भारतानं राजनैतिक प्रभाव आणि आर्थिक संबंध यांसारख्या महत्त्वाच्या बाबींमध्ये मानांकन खाली घसरलंय. सर्वोच्च आशियाई देशांचा प्रभाव कमी झाला असला तरी उत्तम मुत्सद्देगिरीच्या आधारे अमेरिका आपला दर्जा वाढवण्यात यशस्वी ठरल्याचंही या अहवालात म्हटलं गेलंय. त्यामुळेच आशियातील सर्वाधिक शक्तिशाली देशांच्या यादीत अमेरिका शीर्षस्थानी आहे. भारताचा प्रभाव 'लोवी इन्स्टिट्यूट'च्या म्हणण्यानुसार, नकारात्मक 'पॉवर गॅप स्कोअर'मुळे भारत या क्षेत्रात पूर्वीपेक्षा कमी प्रभावशाली ठरतोय. संस्थेच्या 'पॉवर गॅप इंडेक्स'मध्ये भारत आणि श्रीलंकेहून खालच्या क्रमांकावर आहे. यानंतरही, भविष्यातील संसाधनांच्या आधारावर भारतानं सर्वोत्तम कामगिरी केली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे आणि लॉकडाऊनमुळे २०३० साठी कमी आर्थिक अंदाज असूनही भारत केवळ अमेरिका आणि चीनच्या मागे आहे. आर्थिक क्षमता, लष्करी क्षमता, लवचिकता आणि सांस्कृतिक प्रभावाच्या बाबतीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. भारताच्या शेजारील देशांची स्थिती या यादीत चीन वगळता भारताचे सर्व शेजारी देश पूर्वीप्रमाणेच खालच्या स्थानी आहेत. या यादीत १४.७ गुणांसह १५ व्या तर ९.४ गुणांसह १९ व्या क्रमांकावर आहे. २० व्या क्रमांकावर उपस्थिती नोंदवणाऱ्या श्रीलंकेला ८.६ गुण देण्यात आलेत तर २१ व्या क्रमांकावर असलेल्या म्यानमारला ७.४ गुण आणि २५ व्या क्रमांकावर असलेल्या नेपाळला ४.५ गुण मिळालेत. ऑस्ट्रेलियाच्या 'लोवी इन्स्टिट्यूट'कडून दरवर्षी आर्थिक क्षमता, लष्करी क्षमता, अंतर्गत परिस्थिती, भविष्यातील नियोजन, इतर देशांशी आर्थिक संबंध, संरक्षणाचं जाळं, जगातील प्रमुख देशांचा राजकीय - राजनैतिक प्रभाव आणि सांस्कृतिक प्रभाव यांचा अभ्यास करून ही यादी तयार करण्यात येते.