केकेआरच्या हैदराबादवरील विजयाने झाला सर्वात मोठा उलटफेर, बदलले प्ले ऑफचे समीकरण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, May 15, 2022

केकेआरच्या हैदराबादवरील विजयाने झाला सर्वात मोठा उलटफेर, बदलले प्ले ऑफचे समीकरण

https://ift.tt/rVIlOdA
पुणे : केकेआरच्या संघाने हैदराबादवर ५४ धावांची दणदणीत विजय साकारला. या एका विजयानंतर प्ले ऑफची समीकरण चांगलेच बदललेले पाहायला मिळाले. कारण या एका विजयामुळे आयपीएलमधील दोन संघांना मोठे धक्के बसले आहेत. केकेआरच्या विजयानंतर कोणता मोठा उलटफेर झाला, पाहा...हा सामना होण्यापूर्वी केकेआरच्या संघाने १२ सामने खेळले होते. या १२ लढतींमध्ये केकेआरने पाच विजय मिळवले होते, तर त्यांना सात सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे केकेआरच्या संघाने पाच विजयांसह १० गुण पटकावले होते. त्यामुळे केकेआरचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले, असे म्हटले जात होते. पण आजच्या सामन्यात केकेआरने मोठा विजय साकारला आणि गुणतालिकेत मोठे उलटफेर केल्याचे पाहायला मिळाले. केकेआरचा आजचा १३वा सामना होता. या सामन्यात त्यांनी विजय मिळवला. या स्पर्धेतील त्यांचा हा सहावा विजय ठरला. त्यामुळे आता केकेआरच्या संघाने १२ गुण झाले आहेत. केकेआरच्या संघाचा आता एक सामना शिल्लक आहे. त्यामुळे जर केकेआरच्या संघाने हा सामना जिंकला तर त्यांचे १४ गुण होऊ शकतात. त्याचबरोबर जर अन्य प्ले ऑफच्या शर्यतीमधील संघांचे पराभव झाले तर केकेआरला प्ले ऑफची लॉटरी लागू शकते. या सामन्यात मोठा विजय साकारत केकेआरच्या संघाने रनरेटमध्येही चांगली कमाई केली आहे. विजयासह दमदार रनरेट कमावत केकेआरच्या संघाने आता गुणतालिकेत तब्बल दोन संघांना धक्का दिल्याचे पाहायला मिळत आहे. कारण या सामन्यापूर्वी केकेआरचा संघ हा आठव्या स्थानावर होता. पण या विजयानंतर केकेआरच्या संघाने गुणतालिकेत हैदराबाद आणि पंजाब या दोन्ही संघांना धक्के दिले आहेत, त्यामुळे केकेआरचा संघ हा सध्याच्या घडीला सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. त्यामुळे केकेआरचा संघ हा प्ले ऑफच्या जवळ जात असल्याचे पाहायला मिळत आहे. पण केकेआरला आता फक्त एकच संधी असणार आहे. दुसरीकडे पंजाब आणि हैदराबाद यांचे अजून दोन सामने शिल्लक आहेत. पंजाबचे आता १२ गुण आहेत, त्यामुळे दोन्ही सामन्यांत विजयासह त्यांना १६ गुण कमावता येऊ शकतात. हैदराबादचे आता १० गुण असून त्यांनी दोन विजय मिळवले तर त्यांचे १४ गुण होऊ शकतात. त्यामुळे आता प्ले ऑफची रंगत चांगलीच वाढलेली आहे. त्यामुळे आता उर्वरीत १-२ सामन्यांवरच संघांचे या स्पर्धेतील आव्हान कायम राहणार की नाही, हे ठरणार आहे.