Breaking : परशुराम घाटात दरड कोसळली; मुंबई-गोवा महामार्गावरी वाहतूक विस्कळीत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, July 3, 2022

Breaking : परशुराम घाटात दरड कोसळली; मुंबई-गोवा महामार्गावरी वाहतूक विस्कळीत

https://ift.tt/L4u3FeP
प्रसाद रानडे, चिपळूण कोकणात रत्नागिरी व रायगड जिल्हयाला गेले चार दिवस मुसळधार पावसाने झोडपले असून परशुराम घाटात अजस्त्र कोसळल्याने शनिवारी रात्री उशिरा मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या घाटातील दरडींमुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. सुदैवाने यात अन्य कोणतीही हानी झाली नाही.या घटनेची माहिती मिळताच चिपळूणचे प्रांताधिकारी प्रविण पवार आणि तहसीलदार जयराज सूर्यवंशी, महसूल विभागाचे कर्मचारी प्रसन्न पेठे आदी घटनास्थळी दाखल झाले असून रात्री १२:३०च्या सुमारास या महामार्गावरील माती हटवण्यात आली आहे. (traffic on mumbai goa highway was disrupted due to a landslide in parshuram ghat) तुर्तास दोन्ही बाजूकडील वहाने रात्री एक वाजण्याच्या सुमारास सोडण्यात आली. पण याच ठिकाणी आणखी काही दरडींचा भाग खाली येऊ शकतो. म्हणून तूर्तास तरी या परशुराम घाटातील वाहतूक चिरणी मार्गे वळवण्यात आल्याची चिपळूण प्रशानातील खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काहीकाळ बंद झाली होती. याचा मोठा परिणाम मुंबई गोवा महामार्गावर झाला होता. क्लिक करा आणि वाचा- दोन दिवसांपूर्वी याच राष्ट्रीय महामामार्गावर चिपळूण रत्नागिरी दरम्यान असलेल्या कामथे येथे रस्त्याला भेगा पडल्याने मोठी खळबळ उडाली होती. तसेचया मार्गावर एकेरी वाहतूक सुरू ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर आली होती. खेड चिपळूण मार्गावरील परशुराम घाटातही दरडी कोसळण्याचा धोका असल्याने वाहनचालक जीव मुठीत धरुन प्रवास करत आहेत. क्लिक करा आणि वाचा- या महामार्गावर काम करणाऱ्या कल्याण टोलवेज कंपनीबद्दल स्थानिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. वास्तविक हा घाट पावसाळ्यात वाहतुकीसाठी धोकादायक ठरणार असेल तर प्रशासनाने गांभीर्याने याचा विचार करायला हवा. नाराजी व काही तक्रारी असलेल्या कल्याण टोलवेज कंपनीच्या संबंधितांवर जर काही कामात संशयास्पद आढळल्यास जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे, असे अनेकांचे म्हणणे आहे. एप्रिल-मे दरम्यान महिन्याच्या कालावधीत तब्बल एक महिना हा काहीकाळ वाहतुकीस बंद ठेवण्यात आला होता. तरीही मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात अनेक ठिकाणी अजस्त्र दरडी मार्गावर येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. व शनिवारी रात्री त्याचा प्रत्यय आला आहे. क्लिक करा आणि वाचा- ही दरड शनिवारी रात्री कोसळली. त्याच ठिकाणी काही महिन्यापूर्वी अलीकडे एक जेसीबी खाली कोसळला होता. यात एक निष्पाप चालकाचा बळी गेला होता. आज त्याच ठिकाणी पुन्हा दरड कोसळून मातीचा मोठा भराव आल्याने हा राष्ट्रीय महामार्ग काहीकाळ बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर आली.