राज्यात लवकरच सेमीकंडक्टरविषयी सुवार्ता; सायबर सुरक्षा अधिक सक्षम करणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, September 22, 2022

राज्यात लवकरच सेमीकंडक्टरविषयी सुवार्ता; सायबर सुरक्षा अधिक सक्षम करणार

https://ift.tt/rWEHSTV
sameer.karve@timesgroup.com, niraj.pandit@timesgroup.com मुंबई: फॉक्सकॉन कंपनीचा सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरामध्ये गेल्याने नाराज झालेल्या महाराष्ट्राला सेमीकंडक्टरविषयी लवकरच 'सुवार्ता' मिळणार आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कौशल्यविकास राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये ही माहिती दिली. त्याचबरोबर सायबर सुरक्षा अधिक सक्षम करण्यात येणार असून, लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अॅपना यापुढे देशात थारा नसेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मोबाइलसह इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासाठी सेमीकंडक्टर हे अत्यंत कळीचे भाग असून, या क्षेत्रात लवकरच राज्यासाठी सुवार्ता मिळणार आहे. आम्ही महाराष्ट्रात सेमीकंडक्टरच्या क्षेत्रात काय करू इच्छितो हे लवकरच दाखवून देऊ. मी त्यासाठीच ऑक्टोबरमध्ये पुण्यात येणार आहे, असे चंद्रशेखर यांनी सांगितले. माझ्या मोबाइल उद्योगाची सुरुवात महाराष्ट्रातच झाली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली. मात्र, याबाबत अधिक तपशील त्यांनी गुलदस्त्यात ठेवला. हवाई दल अधिकाऱ्याचे पुत्र असलेले राजीव चंद्रशेखर यांनी बीपीएल मोबाइल कंपनी भारतात सुरू केली होती. एकीकडे सेमीकंडक्टर्सचा तुटवडा जाणवत असताना, दुसरीकडे फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातकडे गेला आहे. या उद्योगाला आपण बळ कसे देणार, असे विचारता त्यांनी वरील माहिती दिली. आधीच्या सरकारवर अप्रत्यक्ष टीका करताना ते म्हणाले, सेमीकंडक्टर ज्याचा महत्त्वाचा भाग आहेत, त्या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाचीच स्थिती २०१४पूर्वी डबघाईला आली होती. सर्व फोनही आयात व्हायचे. क्रूड तेलानंतर आयातीमध्ये इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाचा क्रमांक लागायचा. इलेक्ट्रॉनिक्सनिर्मिती उद्योग एक लाख कोटींवर होता. तो सहा वर्षांत २०२१पर्यंत ५.४ लाख कोटी झाला. आता भारतात तयार झालेले आयफोन १४, सॅमसंग गॅलक्सी फोन देशात विक्री करून निर्यातही केले जातात, अशी माहिती त्यांनी दिली. इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात कळीचे असलेल्या सेमीकंडक्टरविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्टी दाखवून डिसेंबर २०२१मध्ये धोरण आणले. त्यानुसार देशात अनेक प्रस्ताव येऊ लागले. त्यापैकी काही गुजरातला गेले. आता महाराष्ट्रात आम्ही काय करू इच्छितो, ते लवकरच दाखवू, असेही त्यांनी सांगितले.