रायगड/माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांचं सत्र सुरु आहे. रेपोली गावाजवळ झालेल्या अपघातात हेदवीला जाणाऱ्या संपूर्ण कुटुंबाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी एका बाईकचाही भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वाराला जागीच प्राण गमवावे लागले.मुंबई गोवा हायवे मृत्यूचा सापळा होत चालल्याची चर्चा आहे. वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या घटनांमुळे कोकणवासी चांगलेच धास्तावले आहेत. मुंबई गोवा महामार्गावर माणगाव तालुक्यातील इको कार आणि ट्रकच्या अपघाताने १० जणांचा करुण अंत झाल्याचे वृत्त ताजे असतानाच आता याच महामार्गावर माणगाव-इंदापूर रस्त्यावर आणखी एक अपघात घडला आहे. ५० वर्षीय महेंद्र शिवराम जाधव हे आपली अॅक्टिवा दुचाकी क्रमांक MH 06 BY 0468 घेऊन माणगावकडून इंदापूरच्या दिशेने निघाले होते. यावेळी इंदापूरकडे जात असताना दुचाकी रस्त्यावर स्लिप झाली. या धक्क्याने ते गाडीवरून उडून खाली जोरात आदळले.या दुर्घटनेत त्यांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली होती. या अपघाताने माणगाव तालुक्यातील वारक गावातील महेंद्र जाधव यांना आपल्या कुटुंबापासून हिरावून नेले आहे. डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.हेही वाचा : या अपघाताचे वृत्त कळतच माणगाव पोलीस संघाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या दुःखद घटनेने जाधव कुटुंबासह वारक गावावर शोककळा पसरली आहे.हेही वाचा :
https://ift.tt/lN7Hq6Q