
मुंबई: टीम इंडिया हॉकी वर्ल्ड कप २०२३ मधून बाहेर पडली आहे. अप्रतिम खेळी दाखवत इथपर्यंत पोहोचलेल्या सामन्यात भारताचा पराभव झाल्याने हा हॉकी विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर रविवारी (२२ जानेवारी) झालेल्या क्रॉसओव्हर सामन्यात न्यूझीलंडकडून शूटआऊटमध्ये भारताला ४-५ असा पराभव स्वीकारावा लागला. १९७५ मध्ये भारताने शेवटचा आणि एकमेव हॉकी विश्वचषक जिंकला होता. तसं पाहिलं तर मोठ्या स्पर्धांमध्ये न्यूझीलंड भारताला नेहमीच पराभवाचे धक्के देत आला आहे. २०१९ मधील उपांत्य फेरीतील सामनाक्रिकेट असो की हॉकी, महत्त्वाच्या सामन्यांमध्ये न्यूझीलंडसमोर टीम इंडियाला अनेक वेळा पराभव पत्करावा लागला आहे. २०१९ मध्ये इंग्लंडमध्ये खेळलेला एकदिवसीय विश्वचषक क्वचितच कोणी विसरू शकेल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी करत त्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले. उपांत्य फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी झाला. भारत न्यूझीलंडवर मात करू शकेल, असे चाहत्यांना वाटत होते, पण घडलं मात्र उलटंच. मँचेस्टरमध्ये झालेल्या त्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताला १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. तो सामना कॅप्टन कुल एमएस धोनीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला.वाचा: टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामनाआयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या सत्राच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने आले होते, त्या सामन्यात किवींनी आठ गडी राखून विजय मिळवला. २०२१ साली इंग्लंडमधील साउथम्प्टन येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात केवळ २१७ धावाच करू शकला होता. यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दमदार पुनरागमन करत किवी संघाला २४९ धावांत गुंडाळले. भारताचा दुसरा डाव केवळ १७० धावांत संपुष्टात आला होता, त्यामुळे न्यूझीलंडला १३९ धावांचे सोपे लक्ष्य मिळाले.हेही वाचा: बाद फेरीच्या अंतिम फेरीत विजय हिसकावून घेतला२००० च्या आयसीसी बाद फेरीच्या अंतिम फेरीतही न्यूझीलंडने भारतीय चाहत्यांची मने तोडली होती. नैरोबी येथे झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने कर्णधार सौरव गांगुलीच्या ११७ आणि सचिन तेंडुलकरच्या ६९ धावांच्या जोरावर ५० षटकांत ६ बाद २६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ पाच गड्यांच्या मोबदल्यात १३२ धावा करत एकदा अडचणीत सापडला होता. पण, अष्टपैलू ख्रिस केर्न्सने नाबाद १०२ धावा करत किवी संघाला चार गडी आणि दोन चेंडू राखून मोठा विजय मिळवून दिला.वाचा: २०२१ च्या टी-२० विश्वचषकातही धक्काआयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवामुळे भारतीय संघाच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. दुबईत खेळल्या गेलेल्या त्या सामन्यात भारतीय संघाला २० षटकांत ७ विकेट गमावत केवळ ११० धावा करता आल्या होत्या. प्रत्युत्तरात किवी संघाने १४.३ षटकांतच १११ धावांचे लक्ष्य गाठता आले. त्याआधी २०१६ आणि २००७ च्या टी-२० विश्वचषकामध्येही न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. इतकेच नाही तर १९७५, १९७९, १९९२ आणि १९९९ च्या वनडे विश्वचषकातही भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभल पत्करावा लागला होता.हेही वाचा: आता तिसऱ्यांदा हॉकी विश्वचषकातही तेचभारत आणि न्यूझीलंड यांच्यातील हॉकी विश्वचषकाच्या इतिहासातील हा सातवा सामना होता. याआधी दोन्ही देशांदरम्यान सहा सामने झाले, ज्यामध्ये भारताने तीन आणि किवी संघाने दोन सामने जिंकले. यादरम्यान १९८६ आणि २००२ च्या विश्वचषकात न्यूझीलंडने भारताचा २-१ अशा फरकाने पराभव केला होता. त्याच वेळी, भारतीय संघ १९९८ च्या विश्वचषकात दोन वेळा आणि १९८२ च्या विश्वचषकात किवींविरुद्ध दोन वेळा विजय मिळवण्यात यशस्वी ठरला होता. तर १९७३ च्या विश्वचषकात दोन्ही संघांमधील सामना १-१ असा बरोबरीत सुटला होता.