प्रजासत्ताक दिनी शाळकरी मुलांना जुंपून भरवली बैलगाडा शर्यत; मुख्याध्यापकांच्या नावाने पळवली बारी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, January 27, 2023

प्रजासत्ताक दिनी शाळकरी मुलांना जुंपून भरवली बैलगाडा शर्यत; मुख्याध्यापकांच्या नावाने पळवली बारी

https://ift.tt/zF0te9f
आंबेगाव, पुणे : प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक शाळांमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. त्यातच पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी येथील जिल्हा परिषद आणि आदर्श माध्यमिक विद्यालयात सास्कृंतीक कार्यक्रमासाठी बैलगाडा शर्यतीचे सादरीकरण करण्यात आले होते. या यावेळी बैलांच्या जागी बैलगाड्याला मुलांना जुंपून शाळेतील मुख्याध्यापकाच्या नावाने बारी पळवण्यात आली. त्यामुळे मुलांनी शाळेत बैलगाडा शर्यत अनुभवली.बैलगाडा शर्यत म्हटलं की अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांमध्ये शर्यतीची उत्सुकता असते. ग्रामीण भागात होणारी शर्यत शाळांपर्यंत पोहचली आहे. ग्रामीण भागतील अनेक शाळांमध्ये बैलगाडा शर्यत हा खेळ खेळला जातो. बैलांऐवजी प्रत्यक्ष मुलांना बैलगाड्याला जुंपून पळवले जाते.आंबेगाव तालुक्यातील शाळेत झालेल्या अनोख्या बैलगाडा शर्यतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चा आता वाढू लागल्या आहेत. जारकर वाडीतील जिल्हा परिषद शाळेत अशी शर्यत झाली. ही शर्यत सुरू असताना नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध गुणदर्शनाचे कार्यक्रमात ही शर्यत भरवण्यात आली होती. त्यामुळे त्याची चर्चा होऊ लागली. आपण अनेकदा म्हणतो, काय बैलसासारखं काम करतो. पण शाळेतल्या मुलांना लावण्यात आलेला बैलगाडा हा एवढा वजनदार नसतो. यामुळे तो पळवत नेताना मुलांना फारसा त्रास होताना दिसत नाही. त्यांना पेलवेल एवढेच वजन होते. त्यामुळे ही बैलगाडा शर्यत ही एक मनोरंजन म्हणून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. कारण यात नागरिकांचा मोठ्या सख्येनं सहभागी झाले होते.काय म्हणाले मुख्याध्यापक?आंबेगाव तालुक्यातील शाळेत झालेल्या अनोख्या बैलगाडा शर्यतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चा सुरू झाल्या. आता शाळेचे मुख्याध्यापक मच्छिन्द्र विठ्ठल काळे यांनी याबाबत माहिती दिली आहे. शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात विविध गुणदर्शन कार्यक्रमात इयत्ता सहावी व सातवीतील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कलाविष्कार म्हणून बैलगाडा शर्यत हा कार्यक्रम सादर केला. असा कार्यक्रम इतर ठिकाणीही अनेकदा सादर झाल्याचे अनुकरण म्हणून व एक आगळा वेगळा कार्यक्रम म्हणून सादर केला. जारकरवाडी गावात १०० टक्के पालक शेतकरी आहेत. त्यांनीही या कार्यक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. ग्रामीण संस्कृती म्हणून सादरीकरणाचा आनंद घेऊन विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली. करोना काळानंतर सांस्कृतिक कार्यक्रम प्रथमच घेतला असल्याने त्यात विद्यार्थ्यांनी स्वतः कार्यक्रम बसवून आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. त्यात कोणत्याही प्रकारचा वेगळा हेतू नव्हता. केवळ मनोरंजन हाच हेतू होता त्यात सर्व उपस्थित पालक सहभागी झाले. त्यामुळे या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कोणत्याही बाबीचा वा कोणाचाही छळ झालेला नाही. आमची शाळा इयत्ता १ली ते ७वी पर्यंतची आहे. २७६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत असल्याने सातत्याने पट वाढत आहे. दरवर्षी शिष्यवृत्ती व इतर स्पर्धा परीक्षेत तसेच कला व क्रीडा स्पर्धामध्ये यशस्वी होत आहेत. सर्व पालक शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थ गावातील सर्व संस्था व ग्रामपंचायत यांचे बहुमोल सहकार्य शाळेस मिळत आहे. सर्व शिक्षक विद्यार्थी गुणवत्ता पूर्ण शिक्षणसाठी कटिबद्ध आहेत. या सांस्कृतिक कार्यक्रमावरून समाजमाध्यमावर वेगळा विपर्यास केला गेलेला दिसून येतो. तसे काही घडलेले नाही, असे मी नम्रपणे सांगत आहे. तसा कोणताही गैरसमज करू नये, ही नम्र विनंती, असे मुख्याध्यापकांनी म्हटले आहे.