
राजापूर, रत्नागिरी : अखेर कोकणवासीय टोल वसुलीचीच्या कक्षेत आले आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील पहिला राजापूरमधील हातीवले येथील टोल नाका सुरू झाला आहे. या टोल वसुलीला स्थानिकांनी चार महिन्यांपूर्वी विरोधक केला होता. मात्र स्थानिकांसाठी दिलासा देणारी ही बातमी आहे. टोल वसुली सुरू झाली आहे. पण स्थानिकांना या टोलूनमधून ७० टक्के सूट देण्यात आली आहे, अशी माहिती टोल प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान उर्वरित २० किलोमीटरच्या अंतराचे काम लवकरच पूर्ण होईल. सध्या ५६ किलोमीटरची टोल आकारणी करीत असल्याचे टोल प्रशासनाने स्पष्ट केले आहे.टोलवर एका ट्रीपसाठी कार चालकांना ९० रुपये मोजावे लागणार आहेत. कोल्हापूर नॅशनेल हायवे अॅथोरिटी यांच्या व्यवस्थापना अंतर्गत ही टोल वसुली आजपासून सुरू झाली आहे. हातीवले ते कणकवली पर्यंतच्या ७० किलोमिटरमधील अंतरासाठी हा टोल असणार आहे. ७० किलोमिटर पैकी ६९ किलोमिटरच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यापैकी ५५ किलोमीटरसाठी हा टोल असणार आहे. स्थानिकांसाठी ७० टक्केपर्यंत सूट असणार आहे. महिन्याला ३३० रुपये भरून स्थानिका मासिकपास मिळवता येणार आहे. अन्य वाहनांसाठी टोल नाक्यावरील दर पुढील प्रमाणे आहेत. वाहनाचा प्रकार - वन वे जर्नी आणि रिटर्न जर्नी (रुपये)> कार - ९० रुपये, परतीसाठी १३० रुपये > एलसीवी (लाइट मोटर वेहिकल / lcv)- १४० रुपये, परतीसाठी २१० रुपये> ट्रक, बस - २९५ रुपये , परतीसाठी ४४५ रुपये> ३ एक्सल - ३२५ रुपये, परतीसाठी ४८५ रुपये> HCM (हेवी मोटर), EME- ४५६ रुपये, परतीसाठी ६९५ रुपये> ओव्हर साइझ एक्सल - ५६५ रुपये, परतीसाठी ८५० रुपये यापूर्वी २२ डिसेंबरला हा टोल नाका सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी टोल वसुली थांबवा अन्यथा आम्ही येथून हलणार नाही अशी आक्रमक भूमिका भाजपा युवानेते माजी खासदार निलेश राणे यांनी घेतली होती. या टोल नाक्यापासून सहाशे मीटर अंतरावर काम सुरू आहे. पाणी योजना विषय आहे. सिंधुदुर्गपासून रायगडपर्यंत कोणताही टोल नाका सुरू नाही. मग हाच हातीवले टोलनाका सुरू का? असा सवाल करत यासाठी सर्वपक्षीय आंदोलन याठिकाणी करण्यात आले होते.