दारूण पराभव इथेच सोडून मगच केपटाऊनला रवाना होणे- रोहित शर्मा; स्पष्ट सांगतो, बुमराहवरच अवलंबून राहता येणार नाही - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, December 30, 2023

दारूण पराभव इथेच सोडून मगच केपटाऊनला रवाना होणे- रोहित शर्मा; स्पष्ट सांगतो, बुमराहवरच अवलंबून राहता येणार नाही

https://ift.tt/69WYHk3
वृत्तसंस्था, सेंच्युरियन‘या पराभवाचे विश्लेषण होईलच. कुठे चुका झाल्या ते शोधून संबंधितांशी बोलावे लागेल; पण सर्वांत महत्त्वाचे आहे ते असा दारूण पराभव इथेच सोडून मगच केपटाऊनला रवाना होणे’, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला कटू आठवणी सेंच्युरियनवरच सोडून नव्या जोमाने आगेकूच करायची आहे. सहाजिकच आहे; कारण गेल्या काही वर्षांतील हा भारताचा दारूण कसोटी पराभव ठरला आहे. फलंदाजी, गोलंदाजी अशा दोन्ही पैलूंमध्ये यजमान दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला लोळवले आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेच्या चार फलंदाजांना बाद केले. मात्र त्याला इतर गोलंदाजांकडून साजेशी साथ लाभली नाही, असे रोहितला वाटते. इतर गोलंदाज कमी पडले असे तो स्पष्ट सांगतो. ‘सेंच्युरियनची खेळपट्टी ही चारशे धावांची नव्हतीच. आम्ही निष्प्रभ ठरत प्रतिस्पर्ध्यांना धावा करण्याची सूट दिली. मात्र असे होते. तसेही भारतीय संघ एका (बुमराह) गोलंदाजावर अवलंबून राहू शकत नाही. त्याच्या जोडीच्या इतर तीन गोलंदाजांनीही कामगिरी करायला हवी. आमच्या प्रतिस्पर्ध्यांनी याच खेळपट्टीवर आम्हाला निरुत्तर केले आहे हे विसरून चालणार नाही. त्यांच्याकडून शिकायला हवे’, रोहित अप्रत्यक्षपणे गोलंदाजांना सुनावतो. फलंदाजीबाबत...स्वतः दोन्ही डावांत अपयशी ठरला. संघाचे फलंदाजीतील अपयशाला जशा तंत्रातील चुका कारणीभूत आहेत, तशाच अपुऱ्या पूर्वतयारीमुळेही असे होऊ शकते, याकडे रोहित लक्ष वेधतो. ‘अशा आव्हानात्मक ठिकाणी फलंदाजाला तंत्रापेक्षाही आत्मविश्वास महत्त्वाचा ठरतो. दक्षिण आफ्रिकासारख्या दौऱ्यावर छाप पाडायची असेल खेळाडूंनी स्वतःचे खासगी डावपेचही तयार ठेवायला हवेत. अशा ठिकाणी असे वैयक्तिक नियोजन तंत्रापेक्षाही सरस ठरते. संघाचे नियोजन, डावपेच तयार असतातच. मात्र खेळाडूने आपली वैयक्तिक अशी पूर्वतयारीही करायला हवी’, असे रोहित म्हणाला.कर्णधाराचे बोल-बुमराहला इतर तीन गोलंदाजांकडून साजेशी साथ लाभली नाही-इतर तिघांनी आपली पाठ ताणत बरेच प्रयत्न केले; पण त्यांच्या हाती काही लागले नाही-असे पराभव गोलंदाजांनाही बरेच काही शिकवून जातात-आशा आहे की, यातून योग्य ती शिकवण घेत ते पुढील कसोटीत दणक्यात पुनरागमन करतील १२६३भारत-द. आफ्रिका सेंच्युरियन कसोटीत एकूण १२६३ चेंडू टाकले (सर्व षटकांत मिळून) गेले. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील ही सर्वांत कमी चेंडूंत रंगलेली कसोटी ठरली. याआधी २०१९च्या भारत-द. आफ्रिका रांची कसोटीत १३२५ चेंडूंत खेळ आटोपला होता. ३४.१भारताचा दुसरा डाव या एवढ्या षटकांत आटोपला. याआधी १९९६मधील डर्बन कसोटीतही भारताचा डाव ३४.१ षटकांत अवघ्या ६६ धावांत आटोपला होता. ५१या आहेत कागिसो रबाडाच्या भारताविरुद्धच्या कसोटी विकेट. भारताविरुद्ध कसोटी बळींचे शतक करणारा तो द. आफ्रिकेचा पाचवा गोलंदाज. १२.८ही आहे रोहित शर्माची दक्षिण आफ्रिकेतील फलंदाजीची सरासरी. या नकोशा यादीत रोहितचा क्रमांक दुसरा. अव्वल आहे तो मोहम्मद हाफीझ. ज्याने येथील १२ डावांत फक्त ११.८३च्या सरासरीने धावा केल्या आहेत. ६.२ही आहे रोहितची रबाडाविरुद्धची सरासरी. रबाडाने रोहितला सहापैकी पाच डावांत बाद केले आहे. २३ही कसोटी ज्या सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर पार पडली तिथे दक्षिण आफ्रिकेने २९ पैकी २३ कसोटी जिंकल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेने घरच्या मैदानावर आणि त्यातही सेंच्युरियन दुसऱ्यांदा भारताला डावाने नमवले. २०१०मध्ये त्यांनी भारतावर एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवला होता.