शतकवीर यशस्वीने मुंबईला पाजले पाणी, हार्दिकसेनेवर पुन्हा पराभवाची नामुष्की... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, April 23, 2024

शतकवीर यशस्वीने मुंबईला पाजले पाणी, हार्दिकसेनेवर पुन्हा पराभवाची नामुष्की...

https://ift.tt/omsvMdI
जयपूर : मुंबईकर यशस्वी जैस्वालने शतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सलाच पाणी पाजल्याचे पाहायला मिळाले. मुंबई इंडियन्स आणि यांच्यामध्ये या आयपीएलमधी हा दुसरा सामना होता. या दुसऱ्या सामन्यातही राजस्थान रॉयल्सने हार्दिकसेनेला धुळ चारल्याचे पाहायला मिळाले. मुंबईचा डाव अडखळत सुरु झाला असला तरी तिलक वर्माच्या ६५ धावांच्या खेळीच्या जोरावर १७९ धावांचा डोंगर उभारता आला होता. पण हार्दिक पंड्याने गोलंदाजीत गोंधळ घातला आणि त्यामुळेच मुंबई इंडियन्सला लय सापडली नाही. पण यशस्वीने या गोष्टीचा चांगलाच फायदा उचलला आणि ६० चेंडूंत नाबाद १०४ धावांची खेळी साकारत संघाला ९ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. राजस्थानचा हा या आयपीएलमधील मुंबईवरचा दुसरा विजय ठरला.राजस्थानने पहिल्या पॉवर प्लेमध्ये बिन बाद ६१ अशी चांगली सुरुवात केली होती. सहा षटकांनंतर पावसामुळे काही वेळ वाया गेला. पावसानंतर खेळात काही बदल होतो का, याकडे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचे लक्ष होते. पण यशस्वी जैस्वालने मुंबईच्या विजयावर पाणी फेरल्याचे पाहायला मिळाले. यशस्वीने सुरुवातीपासून जोरदार फटकेबाजीला सुरुवात केली. पाऊस पडल्यावरही यशस्वी चांगल्या फॉर्मात असल्याचे पाहायला मिळाले. पावसानंतर जोस बटलर २५ चेंडूंत ३५ धावा करून बाद झाला. पण यशस्वी मात्र फटकेबाजी करत होता, यावेळी त्याला कर्णधार संजू सॅमसनची चांगली साथ मिळत होती. यशस्वी आणि संजू या दोघांनी मुंबईच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला आणि राजस्थानच्या विजयाच्या दिशेने मार्गक्रमण केले.मुंबई इंडियन्सच्या डावाची सुरुवात वाईट झाली. रोहित शर्मा ६, ईशान किशन ० आणि सूर्यकुमार यादव १०, असे तीन धक्के मुंबईला फक्त २० धावांत बसले. त्यानंतर तिलक वर्माने मुंबईच्या डावाला चांगला आकार देण्याता प्रयत्न केला. तिलकने नेहाल वधेराच्या साथीने पाचव्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी रचली. वधेराने यावेळी ४९ धावांची खेळी साकारत डतिलकला चांगली साथ दिली. वधेरा बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या हार्दिकला १० चेंडूंत १० धावाच करता आल्या. पण तिलकने मात्र मुंबईच्या धावसंख्येला चांगलाच आकार दिला. तिलकने यावेळी ४५ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ६५ धावांची खेळी साकारली. त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या संघाला १७९ धावा उभारता आल्या.राजस्थानकडून यावेळी संदीप शर्माने ४ षटकांत फक्त १८ धावा देत पाच बळी मिळवण्याची किमया साधली.