पाकिस्तानात आशिया कप; भारत भाग घेणार? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, September 30, 2019

पाकिस्तानात आशिया कप; भारत भाग घेणार?

https://ift.tt/2mf4Uys
यजमानांना बीसीसीआयच्या निश्चितीची प्रतीक्षा वृत्तसंस्था, कराची पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने रविवारी बीसीसीआयला मुदत दिली आहे. २०२०च्या जूनपर्यंतची! पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानात आशिया कप क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होत असून, या स्पर्धेतील सहभागाच्या निश्चितीबाबत पुढील वर्षीच्या जूनपर्यंत कळवावे, असे पाकिस्तानकडून सांगण्यात आले आहे. ‘भारतीय संघ आशिया कप स्पर्धेसाठी पाकिस्तानात यायला तयार होणार की नाही ते बघायचे... अर्थात ही स्पर्धा पुढील वर्षी सप्टेंबरमध्ये आहे; पण त्यासाठी आपल्या सहभागाबाबत निश्चित कळवण्याची मुदत पुढील वर्षीच्या जूनपर्यंत आहे. या स्पर्धेसाठी भारताने स्वारस्य दाखवले नाही, तर आम्हाला तरी स्पर्धेचे यजमानपद मिळणार की नाही, तेदेखील बघता येईल,’ असे पाकिस्तान बोर्डाचे सीईओ वसिम खान यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. मुळात फक्त भारतच नव्हे, तर बांगलादेश आणि श्रीलंका; तसेच अफगाणिस्तान संघही सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता पाकिस्तान जाण्यास तयार व्हायला हवेत. विशेष म्हणजे आशिया कप भारतातून हलवण्याचे अधिकार आशियाई क्रिकेट कौन्सिलला आहेत. याबाबत वसिम खान म्हणाले, ‘त्याचा निर्णय आशियाई कौन्सिल आणि आयसीसी घेईल; पण आमच्या बाजूने आम्ही तयारीला सुरुवात केली असून, त्यानुसारच भारताला मुदत देण्यात आली आहे.’ त्रयस्थ ठिकाण चालेल भारताला मुदत देण्याची भाषा करणाऱ्या वसिम खान यांनी सध्या उभय देशांमधील राजकीय संबंध अस्थिर असल्याची बाब मान्य केली. ‘भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डातील संबंध चांगलेच आहेत; पण त्यांच्याकडे सरकारचा हस्तक्षेप नेहमीच असतो. त्यामुळे आम्ही सतत मालिका आयोजनासाठी बीसीसीआयच्या मागे लागू शकत नाही. बीसीसीआयला आशिया कपमध्ये संघ पाठवावा असे वाटत असेल तर त्यांनी निश्चित होकार कळवावा. आम्हाला त्रयस्थ ठिकाणी स्पर्धा घेण्यासही काहीच हरकत नाही.’