आता भारताविरुद्ध अणुयुद्धच होणार: पाक मंत्री - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 22, 2019

आता भारताविरुद्ध अणुयुद्धच होणार: पाक मंत्री

https://ift.tt/2N4IJ7t
इस्लामाबाद: आंतरराष्ट्रीय स्तरावर समर्थन मिळत नसल्याचे पाहूनही भारताचा शेजारी देश पाकिस्तान अजूनही भारताविरुद्ध युद्धाचीच भाषा करत आहे. तशी स्पष्ट धमकीच पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी दिलीय. या पुढे भारताशी युद्ध हे नेहमीच्या पद्धतीने न होता, ते अणुयुद्धच असेल अशा शब्दांत रशीद यांनी भारताला दिली. सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना रशीद यांनी ही युद्धाची धमकी दिली आहे. भारताविरुद्ध युद्ध सुरू झाल्यास आता ४-६ दिवस रणगाडे आणि तोफा चालणार नाहीत, आता सरळ सरळ अणुयुद्धच होईल, असे रशीद म्हणाले. 'आता नेहमीसारखे युद्ध नाहीच, अणुयुद्ध होणार' मी १२६ दिवस धरणे आंदोलनात सहभागी झालो होतो. त्यावेळी सीमेवरील परिस्थिती अशी नव्हती. सध्या सीमेवर निर्माण झालेली परिस्थिती ही पाकिस्तानसाठी धमकीच आहे आणि हे युद्ध भयंकर असू शकते, असे शेख रशीद म्हणाले. ते पुढे म्हणाले की, हे युद्ध आता पूर्वी सारखे होणारच नाही. काही निर्बुद्ध लोकांना असे वाटते की आता ४-६ दिवस रणगाडे, तोफा चालतील, विमाने उडतील, हवाई हल्ले होतील किंवा मग नौदल तोफांचा मारा करेल. असे मुळीच होणार नाही. हे अणुयुद्ध असेल. हे पूर्णपणे अणुयुद्धच असेल. त्या वेळी जशी गरज निर्माण होईल, तसा पवित्रा घेतला जाईल. वाचा: रशीद यांनी या पूर्वीही दिली होती अणुयुद्धाची धमकी पाकिस्तानचे रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी भारताला या पूर्वीही अणुयुद्धाची धमकी दिली आहे. काही आठवड्यांपूर्वी भारताला धमकी देताना ते म्हणाले की, पाकिस्तानकडे सव्वाशे ग्रॅम आणि अडीच ग्रॅमचे अणुबॉम्ब देखील आहेत. शिवाय त्यांचा विशिष्ट लक्ष्यावरही मारा करता येतो. भारताने हे ऐकावे की पाकिस्तानकडे पाव आणि अर्धा पाव किलोचेही अणुबॉम्ब आहेत आणि या द्वारे ते विशिष्ट लक्ष्यावर डागता येऊ शकतात. शेख रशीद यांच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर खिल्ली देखील उडवली गेली होती. वीजेचा धक्का लागल्यानंतरही घेतले होते पंतप्रधान मोदींचे नाव काही दिवसांपूर्वी एका मिरवणुकीच्या कार्यक्रमात शेख रशीद यांना माईकमधून विजेचा धक्का लागला होता. त्या वेळी त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे नाव घेतले होते. आपल्याला विजेचा धक्का लागण्यामागे भारताचा हात आहे, असे त्या वेळी शेख रशीद म्हणाले होते.