कुठंय मंदी? एका दिवसात २०० मर्सिडिज विकल्या - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 9, 2019

कुठंय मंदी? एका दिवसात २०० मर्सिडिज विकल्या

https://ift.tt/2IC7fLA
मुंबई वाहन उद्योग क्षेत्रात मंदी आहे आणि यामुळे वाहनांची विक्री सतत कमी होतेय, असं बोललं जातंय. पण दसऱ्याला मर्सिडीज बेंझने मुंबई, गुजरात आणि देशातील इतर शहरांमध्ये एकाच दिवसात २०० हून अधिक गाड्या विकल्या आहेत. नवरात्री आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर बुक केलेल्या २०० हून अधिक गाड्यांची डिलिवरी एका दिवसात केली, अशी माहिती कंपनीने दिलीय. फक्त मुंबईतच १२५ हून अधिक गाड्या विकल्या दसर्‍याच्या निमित्ताने मुंबईतच १२५ हून अधिक गाड्यांची डिलिवरी झाली आहे. ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. तर गुजरातमध्ये नवरात्रीच्या मुहूर्तावर ७४ गाड्यांची डिलिवरी झाली. नवरात्री आणि दसऱ्याच्या सणाला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. इतकाच उत्साह २०१८मध्येही ग्राहकांनी दाखवला होता, अशी माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टीन श्वेंक यांनी दिली. कंपनीने सी आणि ई श्रेणीतील सेडानसह GLC आणि GLE सारख्या SUV गाड्यांचीही डिलिवरी केली. प्रत्येक आठवड्याला विकली जाते एक लॅम्बोर्गिनी इटालीतील सुपरस्पोर्ट्स कार कंपनी लॅम्बोर्गिनीची विक्री या वर्षी सुमारे ३० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे, असा अहवाल काही दिवसांपूर्वीच आला होता. २०१९ मध्ये ६५ पेक्षा जास्त लॅम्बोर्गिनी गाड्यांची विक्री होऊ शकते, असा अंदाज आहे. यानुसार सरासरी दर आठवड्याला एक लॅम्बोर्गिनी विकली जातेय. या गाडीची किंमत ३ कोटींच्या आसपास आहे. २०१८मध्ये ४८ लॅम्बोर्गिनी विकल्या २०१८ मध्ये कंपनीने ४८ कार विकल्या आहेत. पुढच्या वर्षी म्हणजे २०२० मध्येही विक्रीत अडीचपट वाढ होईल. तसंच पुढच्या तीन वर्षांत कंपनी वर्षाला १०० गाड्यांची विक्री करेल, असा विश्वास लॅम्बोर्गिनी इंडियाचे प्रमुख शरद अग्रवाल यांनी इकॉनॉमिक टाइम्सशी बोलताना व्यक्त केला. विक्रीत ४० ते ३० टक्के घट दुसरीकडे वाहन क्षेत्रातील इतर कंपन्यांची अवस्था वाईट आहे. गेल्या काही महिन्यांत वाहनांची विक्री ३०-४० टक्क्यांनी कमी झालीय. डिलर्सवर स्टॉकचा बोजा वाढला आहे. ज्यामुळे डिलरशिप बंद होत आहेत. घटत्या विक्रीमुळे मारुती, ह्युंदाई, होंडा, टाटा मोटर्स, महिंद्रा आणि महिंद्रा या कंपन्यांनी अनेक दिवसांपासून उत्पादन बंद केलंय. तर अवजड वाहनं बनवणाऱ्या अशोक लेलँड कंपनीने वेगवेगळ्या उत्पादन केंद्रांवर या महिन्यापासून २ ते १५ दिवस काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय.