अदनान सामीच्या पद्मश्रीवर मनसेचा आक्षेप - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, January 26, 2020

अदनान सामीच्या पद्मश्रीवर मनसेचा आक्षेप

https://ift.tt/3aKCSiI
मुंबई- नुकतेच पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पद्मश्री पुरस्कारासाठी गायक अदनान सामीचं नाव पुढे आलं. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्षेप घेतला असून अदनानला इतक्या लवकर पद्म श्री देण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी अदनान सामीला इतक्या लवकर पद्म श्री पुरस्कार देण्याची घाई का केली असा प्रश्न विचारला. भारताचं नागरिकत्त्व घेऊन अदनानला चार वर्षही झाली नसताना त्याला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे, असंही ते म्हणाले. पद्मश्री पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर अदनान सामने भारत सरकारचे आभार मानत एक ट्वीट केलं. या ट्वीटमध्ये त्याने लिहिले की, 'कोणत्याही कलाकारासाठी हा एक अविस्मरणीय क्षण असतो. पद्म श्री पुरस्कारासाठी माझा विचार केल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. मला संगीत क्षेत्रात काम करून ३४ वर्ष झाली. सर्वांचे आभार.' ट्विटर युझर्स निशाण्यावर- अदनान सामीच्या नावाची पद्मश्रीसाठी घोषणा झाल्यानंतर एका ट्विटर युझरने लिहिले की, 'अरशद सामी खान हे १९६५ च्या भारत- पाकिस्तान युद्धाच्या वेळचे पाकिस्तानचे हीरो होते. त्यांनी अनेक भारतीय विमानांचं नुकसान केलं. आता त्यांचा मुलाला पंतप्रधान नरेंद्र मोदी पद्मश्री पुरस्कार देत आहेत. अभिनंदन सर' या ट्वीटला अदनानने जशच्या तसं उत्तर दिलं आहे. अदनानने ट्वीट करत म्हटलं की, लोकं किती अशिक्षीत असू शकतात जे एखाद्या व्यक्तीची ओळख त्याच्या वडिलांच्या कामावरून करतात. ते त्यांच्या देशाची सेवा करत होते. यात फरक आहे. राजकीय अजेंडा सिद्ध करण्यासाठी कृपया अशा निरर्थक गोष्टी बोलू नका. अदनान सामीने भारतीय नागरिकत्त्वासाठी केव्हा केला होता अर्ज- पाकिस्तानातील लाहोरमध्ये जन्मलेल्या अदनान सामीने २६ मे २०१५ ला गृह मंत्रालयाकडे भारतीय नागरिकत्त्वासाठीचा अर्ज केला होता. यानंतर १ जानेवारी २०१६ मध्ये अदनान सामीला भारतीय नागरिकत्त्व देण्यात आले होते. १ वर्षाच्या पर्यटन व्हिसावर १३ मार्च २००१ मध्ये अदनान सामी पहिल्यांदा भारतात आला होता. या व्हिसा त्याला इस्लामाबाद स्थित भारती उच्चायुक्ताने दिला होता.