नवी दिल्ली : अगोदरपासूनच करोना फैलावण्याचं संकट... त्यातच आता भारतात पूर्वेकडे पूर परिस्थिती तर उत्तरेकडे दिल्लीत होरपळवणाऱ्या उन्हानं गेल्या १८ वर्षांचा रेकॉर्ड तोडलाय. सकाळी-सायंकाळी गरमीपासून मिळणारी सुटकाही आता दुर्लभ झालीय. राजस्थानच्या ही मंगळवारी जगातील सर्वात ठरलं. इथं पारा ५० अंशांवर नोंदवला गेला. दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही उष्णतेनं कळस गाठलाय. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, राजस्थानाहून येणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे उत्तरेकडे वाढलीय. येत्या दोन दिवसांत अर्थात २८ मेपर्यंत वातावरणात खास बदल दिसण्याची चिन्हं नाहीत. या आठवड्याच्या शेवटी हलका पडू शकतो. मंगळवारी जगातील दोन ठिकाणी ५० अंश डिग्री सेल्सिअस तपमान नोंदवलं गेलं. एक होतं भारतातील राजस्थानचं चुरू तर दुसरं होतं पाकिस्तानमधलं जैकबाबाद... हरियाणाच्या हिसार आणि उत्तर प्रदेशच्या बांदाचा पाराही ४८ अंशावर होता. राजधानी दिल्लीत तर उष्णतेनं गेल्या १८ वर्षांचा रेकॉर्ड तोडलाय. दिल्लीत मंगळवारी ४७.६ अंशांची नोंद करण्यात आली. वाचा : वाचा : वाचा : भारत मेट्रोलॉजिकल विभागाच्या म्हणण्यानुसार, उत्तर पश्चिम भारत, मध्य भारत आणि पूर्व भारताच्या जवळपासच्या भागात उष्ण आणि कोरडे वारे पुढच्या दोन दिवसांपर्यंत सुरू राहतील. गरमीच्या दिवसांत दुपारच्या उन्हात दुपारी ११ ते ३ पर्यंत बाहेर पडणं टाळण्याचा सल्ला IMD चे उपसंचालक के एस होसळीकर यांनी दिलाय. हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश आणि विदर्भात २८ मेपर्यंत उष्णता कायम राहील. तर पुढचे दोन दिवस पंजाब, छत्तीसगड, ओडिशा, गुजरात, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार आणि झारखंडमधल्या वेगवेगळ्या भागांत उष्णता कायम राहील. IMD चे रिजनल सेंटर चीफ डॉ. कुलदीप श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार, २८ मे च्या रात्रीपासून या उष्णतेपासून थोडा दिलासा मिळू शकेल. एनआरसी-दिल्लीत २९ आणि मे रोजी ५०-६० किमी प्रति तास वारे वाहू लागतील. तर दुसरीकडे हवामान विभागानं आसाम आणि मेघालयात २६-२८ मे रोजी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केलीय. स्कायमेटच्या अंदाजानुसार, मंगळवारी अरुणाचल प्रदेशच्या पासीघाट परिसरात १४६ मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला. गोलपारा आणि उत्तर लखीमपूरमध्ये मुसळधार पाऊसाची नोंद करण्यात आलीय. यामुळे आसाम आणि मेघालयात अनेक ठिकाणी पुराची परिस्थिती दिसतेय. वाचा : वाचा : वाचा :