मुंबई: स्थलांतरितांसाठी रेल्वे उपलब्ध करून देण्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकार राजकारण करत असल्याचा घणाघाती आरोप राज्याचे गृहमंत्री यांनी केला आहे. 'करोनाच्या संकटकाळात महाराष्ट्राची फजिती कशी करता येईल यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे,' असं देशमुख यांनी म्हटलं आहे. याचा पुरावा म्हणून पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांचे पत्रच देशमुख यांनी सादर केलं आहे. Criticized Piyush Goyal) महाराष्ट्रातील परप्रांतीय मजुरांना आपापल्या राज्यात पाठवण्यासाठी केंद्र सरकार पुरेशा गाड्या उपलब्ध करून देत नसल्याचं राज्य सरकारचं म्हणणं आहे. केंद्रानं हा आरोप फेटाळला आहे. कालच रेल्वेमंत्री यांनी एक ट्विट करून राज्य सरकार मजुरांची व्यवस्था करण्यात कमी पडत असल्याचा आरोप केला होता. महाराष्ट्र सरकारला मंगळवारी आम्ही ८५ गाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या. पण त्यांना प्रवाशांची सोय न करता आल्यानं फक्त २७ गाड्या चालवता आल्या, असं गोयल यांनी म्हटलं होतं. गोयल यांच्या या आरोपाला देशमुख यांनी आज पुराव्यासह उत्तर दिलं. 'पीयूष गोयल यांनी केलेलं विधान दिशाभूल करणारं आहे. पश्चिम बंगालचे मुख्य सचिव राजीव सिन्हा यांनी २२ तारखेला केंद्र सरकारला पत्र लिहिलं होतं. २६ मे पर्यंत कुठल्याही रेल्वे गाड्या आमच्या राज्यात पाठवू नये, अशी विनंती त्यांनी केली होती. अम्फान वादळाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केली होती. असं असतानाही रेल्वे प्रशासनानं महाराष्ट्रातून पश्चिम बंगालला सोडण्यासाठी ३४ गाड्या पाठवल्या. पण त्या गाड्या सोडणं शक्य नव्हतं. हे माहीत असतानाही पीयूष गोयल आता महाराष्ट्र सरकार कसं कमी पडतंय असं बाहेर सांगत आहेत. महाराष्ट्राची फजिती करण्याचा डाव यामागे आहे. संकटाच्या परिस्थितीत गोयल यांनी अशा प्रकारचा खोटारडेपणा आणि असलं राजकारण करू नये,' असं आवाहनही त्यांनी केलं आहे. आणखी वाचा: