...मग सेनेला मुख्यमंत्रिपद का दिलं नाही; राष्ट्रवादीचा फडणवीसांना सवाल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 24, 2020

...मग सेनेला मुख्यमंत्रिपद का दिलं नाही; राष्ट्रवादीचा फडणवीसांना सवाल

https://ift.tt/3hXYNpZ
मुंबई: 'शिवसेनेला सोडून राज्यात सत्ता स्थापन करायची नाही अशी भाजपची भूमिका होती तर शिवसेनेला मुख्यमंत्रिपद का दिलं नाही,' असा रोकडा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या यांनी विरोधी पक्षनेते यांना केला आहे. राजकीय विश्लेषक राजू परुळेकर यांना मंगळवारी दिलेल्या एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी सहा महिन्यांपूर्वी राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडींबद्दल आपली बाजू मांडली होती. शिवसेनेनं आपल्याला दगा दिला, शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलाच नव्हता, असं त्यांनी म्हटलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांकडून आम्हाला सत्तास्थापनेची ऑफर होती. मात्र, शिवसेनेला वगळून आम्हाला राज्यात सरकार स्थापन करायचं नाही अशी आमची भूमिका होती, असा दावाही फडणवीस यांनी या मुलाखतीत केला होता. फडणवीस यांच्या या दाव्याची विद्या चव्हाण यांनी खिल्ली उडवली आहे. 'देवेंद्र फडणवीस हे अजूनही भ्रमित अवस्थेत आहेत. ते करत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांना शिवसेनेला सोडायचं नव्हतं, तर त्यांनी सेनेला मुख्यमंत्रीपद का दिले नाही, असा प्रश्न चव्हाण यांनी केला. 'राज्यात महाविकास आघाडीचं सरकार चांगलं काम करत आहे. फडणवीस यांनी हे वास्तव स्वीकारायला हवं, असा टोलाही त्यांनी हाणला. त्या 'टीव्ही ९' या वृत्तवाहिनीशी बोलत होत्या. वाचा: काय म्हणाले होते फडणवीस? 'मी मुख्यमंत्री असताना काँग्रेसला वेगळे पाडून राष्ट्रवादीला सत्तेत सहभागी करून घेण्याबाबत केंद्रीय नेतृत्वाकडून निर्देश होते. राष्ट्रवादीही याला तयार होती. मात्र हे करत असताना शिवसेनाही सत्तेत राहील, ही अट ठेवण्यात आल्याने राष्ट्रवादी सत्तेत आली नाही', असे ते म्हणाले. 'शिवसेनेने पाठ फिरवल्यानंतर केंद्रीय नेतृत्वाची व आपलीही राष्ट्रवादीशी बोलणी झाली होती. राष्ट्रवादी व भाजपने एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचे ठरले होते. तसेच हे अजित पवार यांच्यासोबत नव्हे, तर थेट राष्ट्रवादीसोबत ठरले होते', असे ठासून सांगत त्यांनी शरद पवार यांच्याकडे अप्रत्यक्षपणे बोट दाखवले होते.