हरिभाऊ जावळेंच्या निधनाबद्दल खडसेंचा धक्कादायक गौप्यस्फोट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, June 17, 2020

हरिभाऊ जावळेंच्या निधनाबद्दल खडसेंचा धक्कादायक गौप्यस्फोट

https://ift.tt/3fAYnUv
जळगाव: ' यांना ज्या इंजेक्शनची गरज होती, ते वेळेवर उपलब्ध होऊ शकले नाही. ते मिळालं असतं तर त्यांचा जीव वाचला असता,' अशी खंत भाजपचे ज्येष्ठ नेते यांनी व्यक्त केली आहे. भाजपचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष व माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचं मुंबईतील खासगी रुग्णालयात काल निधन झालं. त्यांना करोनाची लागण झाली होती. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आलं होतं. त्यांच्यावर दहा दिवस उपचार सुरू होते. मात्र, ते आजारातून सावरले नाहीत व काल दुपारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. आणखी वाचा: जावळे यांच्या निधनाने खडसे यांच्यासह जळगावातील सर्व भाजप कार्यकर्त्यांना धक्का बसला. याबाबत बोलताना खडसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 'रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना ज्या इंजेक्शनची आवश्यकता होती, ते इंजेक्शन वेळेवर उपलब्ध होऊ शकलं नाही. रुग्णालय प्रशासनानं ड्रग 'कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया'कडे त्यासाठी १२ जून रोजी विनंतीही केली होती. त्यानंतर १४ जून रोजी, रविवारी पहिले दोन डोस आले. सोमवारी तीन आणि मंगळवारी दोन असे सात इंजेक्शन उपलब्ध झाले. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. इंजेक्शनचा कोर्स वेळेवर सुरू झाला असता तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. परंतु नियतीला ते मान्य नव्हते,' असं खडसे म्हणाले. 'राज्याचे आरोग्यमंत्री यांच्याकडून याबाबत त्वरीत प्रतिसाद आला होता. त्यांच्या सूचनेनुसार सरकारी अधिकाऱ्यांनी जावळे यांना हव्या असलेल्या औषधांसाठी आवश्यक प्रक्रिया वेगानं पूर्ण केली होती. मात्र, आमचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. सचोटीने व्यवहार करणारा, प्रामाणिकपणाने काम करणारा, कौटुंबिक नाते निर्माण करणारा एक सहकारी आम्ही गमावला आहे. त्यांच्या कुटुंबासोबत आम्ही आहोतच,' असं खडसे म्हणाले. जावळे यांनी दोनदा खासदार म्हणून आणि दोन वेळा आमदार म्हणून जळगाव जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं होतं. सहकार क्षेत्रात त्याचं भरीव कार्य असून, मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची धुराही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. केळी उत्पादकांसाठी त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना राज्यातील कृषी विभागातील राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेली जबाबदारीही त्यांना सोपविण्यात आली होती. केळी प्रक्रियाउद्योग, सूक्ष्मसिंचन तसेच पूर कालवे योजना मतदारसंघात राबविण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. एक मनमिळाऊ माणूस, शांत आणि संयमी नेतृत्त्व म्हणून त्यांची जिल्ह्याच्या राजकारणात ओळख होती.