कडकनाथ घोटाळ्याचे लेखापरीक्षण सुरू; सदाभाऊ खोत यांना दणका? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 13, 2020

कडकनाथ घोटाळ्याचे लेखापरीक्षण सुरू; सदाभाऊ खोत यांना दणका?

https://ift.tt/2DDLDiV
सांगली : संपूर्ण राज्यभर गाजलेल्या प्रकरणाचे ( ) राज्य सरकारकडून सुरू झाले. त्रिसदस्यीय समितीकडून लेखापरीक्षण सुरू असून, याचा अहवाल लवकरच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस प्राप्त होणार आहे. हा अहवाल कोर्टात पुराव्यांसाठी वापरला जाणार असल्याने संशयितांवरील आरोप निश्चित करण्यासाठी याची मोठी मदत होणार आहे. दरम्यान, आर्थिक गुन्ह्यात राज्य सरकारकडून लेखापरीक्षण करण्याची ही सांगली जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. या घोटाळ्यात माजी मंत्री यांच्या नातेवाईकांवर आरोप झाल्याने खोत यांच्यासाठी हा मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. रयत अॅग्रो इंडिया आणि महारयत अॅग्रो इंडियाचे संचालक सुधीर मोहिते व संदीप मोहिते यांनी कंपनीच्या इतर संचालकांच्या मदतीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संगणमत करून कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात शेतक-यांची फसवणूक केली. कमी गुंतवणुकीत मोठा फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून १८ कोटी ४७ लाख ३०० रूपयांची फसवणूक केली. राज्यासह परराज्यातील सुमारे १३०० हून अधिक गुंतवणूकदारांनी या व्यवसायात गुंतवणूक केली होती. याप्रकरणी तानाजी निवृत्ती कदम आणि त्यांचा मुलगा सुदर्शन यांनी इस्लामपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तपास सुरू आहे. आठ जणांवर गुन्हा दाखल झाला असून, यातील सहा जणांना अटक झाली आहे. दोघे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. राज्यातील निवडणुकांची लगबग सुरू होताच या गुन्ह्याचा तपास थंडावला होता. यातच करोना संसर्गामुळे तपासाचे काम थांबले होते. यामुळे कोट्यवधींच्या फसवणुकीचा तपास लटकणार की काय, अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र, राज्य सरकारने या गुन्ह्यात भक्कम पुरावे जमा करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली केल्या आहेत. कडकनाथ कोंबडी प्रकरणाचे सरकारी यंत्रणेकडून स्वतंत्र लेखापरीक्षण करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती पाठवली आहे. या समितीकडून सध्या घोटाळ्याचे लेखापरीक्षण सुरू आहे. आठवडाभरात लेखापरीक्षणाचा अहवाल समितीकडून आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सादर होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा अहवाल कोर्टात पुरावे मांडण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. घोटाळ्यातील संस्थांच्या आर्थिक कारभारामागे असलेल्या व्यक्तीही समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे लेखापरीक्षण अहवालाची उत्सुकता वाढली आहे. या घोटाळ्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी संदीपसिंह गिल हे करत आहेत. राजकीय वातावरण तापणार कडकनाथ कोंबडी घोटाळा प्रकरणात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचे जवळचे नातेवाईक असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. महायुतीच्या काळात गुन्ह्याचा तपास दडपण्याचा प्रयत्न झाल्याच्या तक्रारी आहेत. सरकार बदलल्यानंतर घोटाळ्याचे लेखापरीक्षण सुरू झाल्याने राजकीय वातावरणही तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. याचे पडसाद जिल्ह्याच्या राजकारणात उमटू शकतात.