भारताने सीमा प्रश्न जटील करू नये; चीनच्या उलट्या बोंबा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 13, 2020

भारताने सीमा प्रश्न जटील करू नये; चीनच्या उलट्या बोंबा

https://ift.tt/3gYVPRy
बीजिंग: भारत आणि चीन दरम्यान सीमा प्रश्नामुळे तणाव निर्माण झाला आहे. तणाव निवळण्यासाठी या दोन्ही देशांमध्ये लष्करी पातळीवर अनेक चर्चेच्या फैऱ्याही पार पडल्या आहेत. मात्र, अद्यापही त्यावर तोडगा निघाला नाही. प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चीनच्या उलट्या बोंबा सुरूच आहेत. भारताने सीमा प्रश्न आणखी जटील करू नये चीनने म्हटले आहे. मागील दोन-तीन महिन्यांपासून लडाख येथील चीनसोबतच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव निर्माण झाला आहे. त्यानंतर सुरू झालेल्या चर्चेतून अद्यापही ठोस निर्णय झाला नाही. त्यावर चीनने म्हटले की, सीमेवर आणखी तणाव निर्माण होईल, अशी कोणतीही कारवाई भारत करणार नाही अशी चीनला अपेक्षा आहे. सीमा भागात शांतता आणि स्थिरता निर्माण करण्यासाठी दोन्ही पक्षातील संबंध चांगले होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल असेही चीनने म्हटले आहे. वाचा: भारताने चीनला रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या असणाऱ्या डेपसांग-दौलत बेग ओल्डी (डीबीओ) सेक्टरमधून आपल्या सैनिकांना मागे बोलवण्याचा आणि त्या लगतच्या भागातील बांधकाम रोखण्यास सांगितले होते. या भागात हजारोंच्या संख्येने सैन्य असून रणगाडे, आर्टिलरी गनही तैनात करण्यात आल्या आहेत. लडाख पूर्व भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पँगोंग त्सो आणि डेपसांगशिवाय इतर भागातही सैन्य माघारीबाबत चर्चा सुरू आहे. वाचा: ८ ऑगस्ट रोजी दौलत बेग ओल्डी भागात मेजर जनरल स्तरावर चर्चा करण्यात आली. यामध्ये भारताने चिनी सैन्याने लवकरात लवकर माघार घ्यावी आणि लडाख प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाच मे पूर्वी असलेली परिस्थिती पुन्हा निर्माण करण्यावर भर दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने गलवान आणि इतर काही भागातून सैन्य माघारी घेतले आहे. मात्र, पँगोग त्सो, गोगरा आणि डेपसांगमध्ये सैन्य माघारीची प्रक्रिया अद्यापही सुरू झाली नाही. वाचा: लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत-चीनच्या सैन्यामध्ये हिंसक संघर्षही झाला. या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले होते. त्यानंतर चीनविरोधात देशभरातून आणखी संताप व्यक्त होत आहे. या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये लष्कर अधिकारी पातळीवर चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यानंतर गलवानमधून चीन व भारताने सैन्य माघारीसाठी अनुकूलता दाखवली. मात्र, लडाखमधील इतर भागातून चीनने अद्याप माघार घेतली नाही.