आजोबांनी नातवाची लायकी काढली हे पहिल्यांदाच पाहिलं: निलेश राणे - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, August 13, 2020

आजोबांनी नातवाची लायकी काढली हे पहिल्यांदाच पाहिलं: निलेश राणे

https://ift.tt/33TBp8E
मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांनी यांना जाहीरपणे झापल्यानंतर आता त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररित्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं, अशी प्रतिक्रिया माजी खासदार आणि भाजप नेते यांनी व्यक्त केली आहे. निलेश राणे यांनी ट्विट करून ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. स्वतःच्या नातवाला ज्या भाषेत शरद पवारांनी फटकारले हे वाचून व ऐकून धक्का बसला. एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच बघितले, असं सांगतानाच हा राग पार्थने राम मंदिरला समर्थन दिलं म्हणून होता की सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली म्हणून होता?, असा सवाल निलेश राणे यांनी पवारांना केला आहे.
    तर, या मुद्द्यावरून आमदार नितेश राणे यांनी पार्थ यांची पाठराखण केली होती. त्यांनी पार्थ यांना लंबी रेस का घोडा म्हटलं होतं. आज परत सांगतो. पार्थ लंबी रेस का घोडा आहे. थांबू नकोस मित्रा, असं नितेश यांनी म्हटलं होतं. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा पवार कुटुंबातील प्रश्न आहे, असं सांगत पवारांना टोला लगावला होता. काय म्हणाले होते पवार? पार्थचा अनुभव कमी आहे. तो प्रगल्भ नाही. त्यामुळे माझ्या नातवाच्या बोलण्याला मी कवडीचीही किंमत देत नाही, असं पवार म्हणाले. तसेच कुणाला सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी करायची असेल तर आमचं काही म्हणणं नाही. कुणाला सीबीआय चौकशीची गरज वाटत असेल तर त्याला विरोध असण्याचं कारणही नाही. मात्र, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे, असं पवार म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास पार्थ यांनी नकार दिला होता. मला काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी एक निवेदन देऊन सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती. आपल्याला देशभरातून तरुणांचे फोन येत आहेत. खासकरून यूपी, बिहारमधून अधिक फोन येत असून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी तरुणांची भावना आहे. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, असं पार्थ यांनी म्हटलं होतं.