अमित शाह ते फडणवीस; हैदराबाद महापालिकेसाठी भाजपने एवढी ताकद का लावली? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 30, 2020

अमित शाह ते फडणवीस; हैदराबाद महापालिकेसाठी भाजपने एवढी ताकद का लावली?

https://ift.tt/36hoqOR
हैदराबाद : ग्रेटर हैदराबाद महापालिका निवडणुकीचा प्रचार रविवारी सायंकाळी संपला असून आता १ डिसेंबरला मतदान होईल. महापालिका निवडणुकीत भाजपने ज्या आक्रमकतेने प्रचार केला, ते पाहता सर्वच जण हैराण होते. या निवडणुकीला एका मोठ्या निवडणुकीचं स्वरुप देत भाजपच्या दिग्गज नेत्यांनी ताकद लावली. टीआरएस आणि एमआयएमच्या बालेकिल्ल्यात जम बसवणं एवढंही सोपं नाही, याची पूर्ण जाणिव भाजपला आहे. त्यामुळे जम बसवण्याची एक चांगली संधी म्हणून याकडे पाहत आहे. २०१६ च्या हैदराबाद महापालिका निवडणुकीत सत्ताधारी टीआरएसने ९९ आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमने ४४ च्या तुलनेत फक्त ५ जागा मिळवल्या. पुढचा महापौर आपलाच असेल, असा दावा भाजप नेते प्रचारात करत आहेत. पण पक्षातील सूत्रांच्या मते, हैदराबादमध्ये बहुमत मिळवणं एवढंही सोपं नाही याची पूर्ण जाणिव वरिष्ठांना आहे. काय आहे भाजपचा प्लॅन? भाजपच्या एका नेत्याच्या मते, 'भाजपने त्रिपुरात ज्या पद्धतीने शून्यापासून ते बहुमतापर्यंत मजल मारली, तशी अपेक्षा हैदराबादमध्ये नाही'. भाजपचे महासचिव भूपेंद्र यादव या महापालिका निवडणुकीचे प्रभारी आहेत. भूपेंद्र यादव म्हणतात, 'अनेक जण विचारतात की भाजप महापालिका निवडणुकीसाठी एवढी ताकद का लावत आहे. का असा प्रश्न विचारणाऱ्यांना प्रतिप्रश्न आहे, की का नाही?' सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपच्या दिग्गज नेत्यांनी हैदराबादमध्ये प्रचार केला. या निवडणुकीच्या माध्यमातून पूर्ण हैदराबादमध्ये एक चांगला पर्याय म्हणून स्थापित होणं हे भाजपचं लक्ष आहे. रणनितीकारांच्या मते, टीआरएसच्या पतनाचं कारण मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि त्यांचे नेतेच असतील. कारण, त्यांच्यावर घराणेशाहीचा ठपका बसला आहे. यासोबतच पक्षावर भ्रष्टाचार आणि प्रशासकीय अकार्यक्षमतेचाही आरोप होतो. भाजपने तेलंगणातील यशाचं सूत्र शोधलं? हैदराबादमध्ये अखेरच्या दिवशी प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा झाली. ते म्हणाले, 'आम्ही तेलंगणाला घराणेशाहीपासून लोकशाहीपर्यंत घेऊन जाणार आहोत. भ्रष्टाचारापासून ते पारदर्शकतेपर्यंत आणि तुच्छतेच्या राजकारणापासून ते विकासापर्यंत घेऊन जायचं आहे.' अमित शाहांच्या या वक्तव्यामुळे पक्षाचं लक्ष्य स्पष्ट आहे की, ते मुख्यमंत्री केसीआर आणि त्यांच्या कुटुंबावर निशाणा साधत आहेत. केसीआर यांच्या कुटुंबावर भ्रष्टाचार आणि घराणेशाहीला चालना दिल्याचा आरोप नेहमी होतो. भाजप तेलंगणाचा मूड बदलण्याच्या तयारीत? दुबक्का पोटनिवडणुकीत भाजपच्या आश्चर्यकारक विजयामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. तेलंगणाच्या स्थापनेत मोलाची भूमिका निभावल्याबद्दल केसीआर यांच्या ऋणातून आता बाहेर येण्याच्या मूडमध्ये तेलंगणाची जनता असल्याचं जाणकार सांगतात. दुबक्काची सीमा गजवेल, सिरसिला आणि सिद्दीपेटला लागून आहे. गजवेलचं प्रतिनिधित्व केसीआर स्वतः करतात, तर सिरसिला हा त्यांचे चिरंजीव आणि आयटी मंत्री केटी रामाराव यांचा मतदारसंघ आहे, तर सिद्दीपेट केसीआर यांचे पुतणे हरीश राव यांचा बालेकिल्ला आहे. लोकसभेतील विजयाने मनोबल वाढवलं भाजपच्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत तेलंगणात ४ जागांवर विजय मिळवला, ज्यामुळे कार्यकर्त्यांचंही मनोबल वाढण्यास मदत झाली. विशेष म्हणजे काँग्रेस आणि टीडीपीला हैदराबादमध्ये एक प्रमुख विरोधीपक्ष नेता म्हणून जागा घेण्यातही अपयश आलं. त्यामुळे भाजप तेलंगणात एक सक्षम पर्याय तयार होण्यासाठी पूर्ण ताकद लावत आहे.