क्रिकेट इतिहासात दिग्गजांना जमले नाही; हा विक्रम फक्त अझरच्या नावावर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, February 8, 2021

क्रिकेट इतिहासात दिग्गजांना जमले नाही; हा विक्रम फक्त अझरच्या नावावर

https://ift.tt/3oSsYBq
नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन ()आज त्याचा ५८वा वाढदिवस साजरा करत आहे. भारतीय संघाच्या वनडे आणि कसोटी संघाचे नेतृत्व करणाऱ्या अझरने करिअरमध्ये अनेक विक्रम केले आहेत जे अद्याप त्याच्या नावावर आहेत. अझरच्या जन्म ८ फेब्रुवारी १९६० रोजी हैदराबादमध्ये झाला. भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरलेल्या अझरवर मॅच फिक्सिंगचे आरोप झाले. पण त्यानंतर देखील तो लढत राहिला. अझरच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याच्या विक्रमाबद्दल... वाचा- क्रिकेटमध्ये काही विक्रम असे असतात जे एका विशिष्ट खेळाडूच्या नावावर कायम राहतात. भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरूद्दीनला हीच गोष्ट लागू होते. अझरने कसोटी क्रिकेटच्या पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावले. इतक्यावरच तो थांबला नाही. तर त्यानंतरच्या सलग दोन कसोटी शतक करत अझरने धमाकेदार कामगिरी केली जी आजपर्यंत कोणत्याही क्रिकेटपटूला करता आली नाही. अझरने पदार्पणानंतर सलग ३ कसोटी शतक झळकावले होते. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो एकमेव खेळाडू आहे. वाचा- ज्या प्रमाणे अझरने पहिल्या कसोटीत शतक केले होते. त्याच प्रमाणे त्याने खेळलेल्या अखेरच्या कसोटीत देखील शतक केले होते. पहिल्या आणि अखेरच्या कसोटीत शतक करणारा तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. अझर शिवाय रेगी डफ (ऑस्ट्रेलिया), बिल पोंसफोर्ड (ऑस्ट्रेलिया), ग्रेग चॅपल (ऑस्ट्रेलिया), एलिस्टर कुक (इंग्लंड) यांनी अशी कामगिरी केली आहे. मोहम्मद अझरूद्दीने ३६ वर्षापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत खळबळ उडवली होती. मनगटाने शानदार फटकेबाजी करणाऱ्या अझरला वंडर बॉय म्हणून ओळखले जायचे. अझरने फक्त पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावले नव्हेत तर पहिल्या तिनही कसोटीत शतक करण्याची ऐतिहासिक कामगिरी त्याने केली होती. अझरचा हा विक्रम १ फेब्रुवारी १९८५ रोजी झाला होता, जो आजपर्यंत कायम आहे. वाचा- वाचा- ... अझरने ३१ डिसेंबर १९८४ रोजी इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटीत ११० धावा केल्या होत्या. पदार्पणात शतक करून अझर थांबला नाही. तर त्यानंतर चेन्नईत (मद्रास) झालेल्या दुसऱ्या कसोटीत ४८ आणि १०५ धावा केल्या. तर मालिकेतील अखेरच्या कसोटीत (कानपूर) त्याने पहिल्या डावात १२२ तर दुसऱ्या डावात नाबाद ५४ धावा केल्या. गेल्या ३६ वर्षात अझरूद्दीनच्या या विक्रमाच्या जवळ ५ फलंदाज पोहोचले. पण या कोणत्याही फलंदाजाला त्याचा विक्रम मोडता आला नाही. या सर्वांनी पदार्पणात सलग दोन शतक केली. या खेळाडूंमध्ये सौरव गांगुली आणि रोहित शर्मा या दोन भारतीय खेळाडूंचा देखील समावेश आहे. गांगुलीने १९९६ मध्ये लॉर्ड्स मैदानावर पदार्पणातच आणि त्यानंतर नॉटिंघम येथे दुसऱ्या कसोटीत शतक केले होते. रोहितने २०१३ साली वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकाता आणि नंतर मुंबईत शतकी खेळी केली. इंग्लंडचा संघ १९८४-८५ मध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर होता. पहिल्या मुंबई कसोटीत भारताने विजय मिळवला. पण दुसऱ्या दिल्ली कसोटीत त्याचा पराभव झाला. या पराभवाला कपिल देव यांच्या खराभ फलंदाजीला जबाबदार धरण्यात आले. यावरून बराच राडा झाला. त्यामुळे कोलकात्यात होणाऱ्या कसोटीत कपिल देव यांना वगळले. संदीप पाटील देखील संघाबाहेर होते. तेव्हाच २१ वर्षीय अझरला संधी मिळाली. त्याने सलग तीन शतक केली आणि अशी कामगिरी करणारा पहिला आणि एकमेव फलंदाज होण्याचा मान मिळवला. हा विक्रम अद्याप त्याच्या नावावर आहे. अझरने ९९ कसोटीत २२ शतक झळकावली. त्याने मार्च २००० मध्ये खेळलेल्या अखेरच्या कसोटीत १०२ धावा केल्या होत्या. पण अझरला १००वी कसोटी खेळता आली नाही. त्याआधी मॅच फिक्सिंगमुळे त्याच्यावर आजीवन बंदी आली. अझरने भारतीय संघाचे आयसीसी वर्ल्डकपच्या ३ स्पर्धेत नेतृत्व केले आहे. अशी कामगिरी करणारा देखील तो एकमेव भारतीय कर्णधार आहे.