मिथुनदांचा वापर केला जातोय; 'या' अभिनेत्याचा भाजपवर आरोप - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, March 9, 2021

मिथुनदांचा वापर केला जातोय; 'या' अभिनेत्याचा भाजपवर आरोप

https://ift.tt/3v4xCAt
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर पश्चिम बंगालमधील निवडणुकीत स्वत:च्या फायद्यासाठी भाजपने अभिनेते यांना पक्षात घेतल्याचा आरोप ज्येष्ठ अभिनेते व भाजपचे माजी केंद्रीय मंत्री यांनी केला. महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त येथे आला असता मीडियाच्या प्रतिनिधीशी बोलताना सिन्हा यांनी पंतप्रधानांसह भाजपवर परत एकदा तोफ डागली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. मात्र, त्यांच्यावर मात करण्यासाठी भाजपकडून सर्वतोपरी प्रयत्न चालले आहेत. मिथुन चक्रवर्ती माझे जवळचे मित्र आहेत. एका चांगला माणूस आहे. पण, भाजपमध्ये जाताच भाषा बदलली. साप, कोब्रा, विंचवाबद्दल बोलल्याने त्याचा पक्षाला लाभ होईल, असे वाटत नाही, ही भाषा योग्य नाही, अशी खंत व्यक्त करून सिन्हा म्हणाले, राजकारणासाठी चक्रवर्तींचा वापर केला जात आहे. यापूर्वीही ते राजकारणात होते व अनेक पक्षांचा त्यांना अनुभव आहे. मात्र, त्यांना विलंब तर झाला नाही ना, असे वाटते. ममता यांची प्रतिमा अतिशय चांगली असून पश्चिम बंगालची जनता त्यांच्यासोबत आहे. भाजपकडून होत असलेला कडव्या विरोधामुळे त्यांना सहानुभूती मिळू शकते, असेही ते म्हणाले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या मागे ईडी लावण्याचा प्रयत्न करताच महाराष्ट्रात चित्र बदलले. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या मागे २५ हेलिकॉप्टरचा ससेमिरा लावला होता. काय झाले, हे सर्वांना माहिती आहे, याकडेही सिन्हांनी लक्ष वेधले. 'बह गया' पंतप्रधान यांचे रविवारी पश्चिम बंगालमध्ये झालेले भाषण 'बहक गया', 'बह गया'अशा स्वरूपाचे होते, अशा शब्दात शत्रुघ्न सिन्हा यांनी तोफ डागली. सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर बोलण्याचे पंतप्रधानांनी टाळले. शेतकरी आंदोलन, जीडीपी, इंधन दरवाढ यासारख्या ज्वलंत प्रश्नाला त्यांनी स्पर्शही केला नाही. शेतकरी जनतेला 'दवा'नाही तर 'दुवा'ची गरज असल्याचे ते म्हणाले. वाचा: