भारतीय संघाचे चाहते काळजीत; आता कर्णधाराने या गोष्टीचे अर्धशतक करू नये - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, August 16, 2021

भारतीय संघाचे चाहते काळजीत; आता कर्णधाराने या गोष्टीचे अर्धशतक करू नये

https://ift.tt/3k0jyTN
नवी दिल्ली: भारताचा कर्णधार विराट कोहलीने लॉर्ड्स येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात फक्त २० धावा केल्या. रन मशिन अशी ओळख असलेल्या विराट कोहलीला पुन्हा एकदा धावा करण्यात अपयश आल्याने त्याचे चाहते नक्कीच निराश झाले असतील. काहींनी त्याला सोशल मीडियावर ट्रोल केले. विराटने याआधी कामगिरी इतक्या उच्च स्तरावर नेली आहे की ज्यामुळे चाहत्यांना आता अपयश पचवण्यास जड जात आहे. वाचा- दुसऱ्या डावात २० धावांवर बाद झाल्याने विराट आता एका नकोशा विक्रमाच्या उंबरठ्यावर उभा आहे. विराटने आतापर्यंत २७ शतक आणि २५ अर्धशतक केली आहेत. पण आता तो अशा एका अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे जो त्याने करू नये अशी सर्वांची अपेक्षा आहे. वाचा- विराटने डिसेंबर २०१९ मध्ये बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले होते. त्यानंतर त्याला एकही शतक करता आले नाही. बांगलादेशविरुद्धच्या शतकानंतर विराटने ४९ डाव खेळले आहेत. इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात जर विराटने शतक केले नाही तर शतकाशिवायचे त्याचे ५० डाव होतील. विराटने आतापर्यंत अनेक विक्रम स्वत:च्या नावावर केले आहेत. पण हा विक्रम त्याच्या नावावर होऊ नये असे सर्वांना वाटत असेल. वाचा- वाचा- याआधी विराटच्या करिअरमध्ये असे दोन वेळा झाले होते जेव्हा त्याला दोन शतकांच्या मध्ये बराच वेळ लागला होता. फेब्रुवारी २०११ ते सप्टेंबर २०११ या काळात २४ डावा त्याला शतक करता आले नव्हते. त्यानंतर फेब्रुवारी २०१४ ते ऑक्टोबर २०१४ या काळात २५ डावात तो शतक करू शकला नव्हता. पण यावेळी विराट ४९ डावांपर्यंत पोहोचला आहे. विराटसाठी सर्व गोष्टी बरोबर होत आहेत. जी विराटची सर्वात मोठी ताकद होती तीच आता अडचण झाली आहे. विराटचे शॉट सिलेक्शन चुकत आहे. विराटने मैदानावर थोडा अधिक वेळ थांबला तर तो पुन्हा फॉर्ममध्ये येऊ शकेल असे चाहत्यांना वाटते.