पालकांनो मुलांसोबत रहा! करोनाकाळात मानसिक, शारीरिक समस्यांमध्ये वाढ - Times of Maharashtra

Tuesday, August 31, 2021

demo-image

पालकांनो मुलांसोबत रहा! करोनाकाळात मानसिक, शारीरिक समस्यांमध्ये वाढ

https://ift.tt/3yuDunf
photo-85785579
म. टा. विशेष प्रतिनिधी, आली तर त्यात सर्वाधिक धोका मुलांना आहे, या भीतीने मागील काही महिन्यांपासून मुलांना घरातून बाहेरच पडू न देणाऱ्या पालकांची संख्या मोठी आहे. परिणामी मुलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मानसिक, भावनिक तसेच शारीरिक समस्या निर्माण होत आहेत. लॉकडाउननंतर मुलांमध्ये ज्या समस्या निर्माण झाल्या होत्या, त्यापेक्षा ही संख्या अधिक असल्याचा सूर वैद्यकीय तज्ज्ञांकडून ऐकू येत आहे. वाढलेले वजन ही मुलांमधील सर्वांत मोठी समस्या असल्याचे बालरोगतज्ज्ञ सांगतात. मागील दोन वर्षांत अनेक मुलांच्या वजनामध्ये आठ ते दहा किलो वाढ झाली आहे. सतत बाहेरचे पदार्थ खाणे, कोणतीही शारीरिक हालचाल नसणे, व्यायामाचा अभाव, सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे कॅल्शिअमची कमतरता, अंगदुखी, पायदुखी अशा मुलांच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या पालकांची संख्या वाढती आहे, असे डॉ. वैदेही पाटील यांनी सांगितले. पावसाळी आजारासह जीवनशैलीमुळे निर्माण झालेल्या या समस्या वाढत्या असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास येत आहे. पालक दिवसभर घरात असतात, मात्र मुलांसाठी त्यांच्याकडे वेळ नसतो, असे चित्र दिसत असल्याचे डॉ. समीर दलवाई यांनी सांगितले. मुलांचे भावनिक आरोग्य जपण्यासाठी विशेषत्वाने प्रय़त्न करायला हवेत. त्यासाठी पालकांनी त्यांना वेळ द्यायला हवा, त्यांच्यासोबत संवाद वाढवायला हवा. वाढत्या वजनामुळे मुलांमध्ये शारीरिक आणि भावनिक पातळ्यांवर वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. ऑनलाइन वर्ग सुरू असताना पालकांना कामातून ब्रेक मिळाल्यानंतर मुलांना जेवण भरवले जाते. स्क्रीनटाइममध्ये किती खातो याकडे मुलांचे लक्ष नसते. या साऱ्याचा एकत्रित परिणाम मुलांचे वजन वाढण्यामध्ये होतो. पावसाळी आजार वाढते डेंग्यू, मलेरिया तसेच व्हायरल स्वरूपाचा ताप असलेल्या बालरुग्णांची संख्या मुंबईत वाढती आहे. सर्दी, खोकला, ताप येण्यासह डोकेदुखी तसेच डोळ्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारीही मुलांमध्ये वाढलेल्या आहेत. 'पालकांनो मुलांसोबत रहा' मुलांची काळजी घेत असताना पालकांनी त्यांना सुरक्षित ठिकाणी खेळायला सोडावे, त्यांना सोबत द्यावी. करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून तीन ते चार मुलांच्या गटाने काही खेळ, संगीत, चित्रकला या गोष्टी मुलांकडून करून घेण्याचा आग्रह बालहक्क चळवळीमध्ये काम करणाऱ्या वसुधा मोरे यांनी व्यक्त केला आहे. संसर्गाच्या भीतीने मुलांना खेळ, मित्रमैत्रीणींशी संवादापासून दूर ठेवल्यामुळे मुलांच्या वर्तनाशी निगडित इतर प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे या सर्व बाबींचा सारासार विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Pages