उद्धव ठाकरे म्हणजे ग्रेट CM, एकनाथ शिंदेंनी केलेलं काम सौदेबाजीचं, राष्ट्रवादी ठाकरेंच्या पाठिशी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, July 23, 2022

उद्धव ठाकरे म्हणजे ग्रेट CM, एकनाथ शिंदेंनी केलेलं काम सौदेबाजीचं, राष्ट्रवादी ठाकरेंच्या पाठिशी

https://ift.tt/ZP0QsEd
मुंबई : महाराष्ट्राचे उत्तम मुख्यमंत्री म्हणून यांचे नाव घेतले जात होते. त्याच ठाकरे यांचे सरकार पाडण्यासाठी हे लोक कोणत्या थराला गेले, हे सर्वांनी पाहिले. त्यामुळे या प्रकाराला सौदेबाजीच म्हणता येईल. महाराष्ट्रातील मतदारांना हे बिलकूल आवडलेले नाही, अशी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या यांनी केली. गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी इतरांवर टीका करताना आधी स्वतःचे रक्त तपासावे. कारण ते स्वतः पहिल्यांदा प्रवीण भोसले यांच्या खांद्यावर पाय ठेवून मोठे झाले. तिथून ते काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसमध्ये नारायण राणे यांच्यासोबत पटलं नाही म्हणून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले. इथून ते आणखी कुठे गेले. त्यामुळे शिवसेना कुणामध्ये ठासून भरली आहे, हे बोलण्याचा त्यांना अधिकार नाही, असा टोला विद्या चव्हाण यांनी लगावला. मुख्यमंत्री शिंदे हे केवळ रबर स्टँप, फडणवीसांच्या इशाऱ्यावर सरकार चालतंय मुंबईतील पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने आरे मेट्रो कारशेडला स्थगिती देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. आरेचे पर्यावरणीय महत्त्व पाहता कारशेड कांजुरमार्ग येथे व्हावे अशीच मुंबईकरांचीही इच्छा होती. मात्र शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर ताबडतोब आरेमध्ये कारशेड बनविण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री शिंदे हे केवळ रबर स्टँप असून उपमुख्यमंत्री यांच्या इशाऱ्यावर चालत आहेत. त्यामुळे आज फडणवीस आणि भाजपला शिवसेना फोडल्याचा आनंद होत असला तरी शिवसेना सहजासहजी फुटणार नाही. पुढील दीड-दोन वर्षात खरे चित्र लोकांसमोर येईल, असे त्या म्हणाल्या. शिवसेना आमदारांची गद्दारी महाराष्ट्रातील जनता कधीही विसरणार नाही तसेच माध्यमातून उद्धव ठाकरे हे व्हिलन असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न सुरु आहे. शिंदे यांनी जी गद्दारी केली, ती महाराष्ट्रातील जनता कधीही विसरणार नाही, असेही त्या म्हणाल्या. भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावरही विद्याताईंनी जोरदार टीका केली. तुम्ही पत्रकार परिषदा घेऊन इतरांच्या खासगी आयुष्यात डोकावत आहात, मात्र तुमचेही खासगी आयुष्य आहेच. त्याबाबत जर अशाप्रकारे कुणी जाहीर वाच्यता केली तर? असा सवाल विद्याताईंनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.