
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हात वाघ आणि मानव संघर्षाने टोकं गाठलं आहे. गेल्या तीन दिवसांत वाघाच्या हल्यात चार जणांचा बळी गेला आहे. वाघाच्या हल्यात मूल तालुक्यातील दोन गुराखी बुधवारी ठार झाले होते. या घटनेला चोवीस तासही उलटले नसताना ब्रम्हपुरी तालुक्यात आज एका महिलेला वाघाने भक्ष्य केलं. तर, पोंभूर्णा तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झाला आहे. अवघ्या तीन दिवसात घडलेल्या या घटनांनी जिल्ह्यात दहशत पसरली आहे. (four people have lost lives in a in three days) जनावरांसाठी गवत कापण्याकरिता शेतात गेलेल्या शेतकरी महिलेवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा येथे घडली. रूपा रामचंद्र म्हस्के (४०) असे मृत महिलेचे नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वाघाने तीन दिवसात चार जणांचे बळी घेतले. तर एक शेतकरी गंभीर जखमी आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र होत असून यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. मृत महिलेच्या पश्चात तीन मुले व पती असा आप्तपरिवार आहे. या घटनेमुळे हळदा परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. क्लिक करा आणि वाचा- वाघाचा मृतदेह आढळला; वाघाचे अवयव सुरक्षित बल्हारशाह वनपरिक्षेत्रा अंतर्गत नियतक्षेत्र सातारा कोमटी मधील कक्ष क्र. ४३९ मध्ये गस्ती दरम्यान वाघाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खडबड उडाली. मृत वाघ नर असून अंदाजे तीन वर्षांचा आहे. वाघाचे संपूर्ण अवयव सुरक्षित आहेत. शवविच्छेदनानंतर वाघाच्या अवयवाचे नमुने घेण्यात आले. क्लिक करा आणि वाचा- सदर नमुने परिक्षणाकरीता रासायनिक विश्लेषक, जिल्हा न्यायसहाय्यक, वैद्यकिय प्रयोगशाळा नागपूर येथे पाठविण्यात येणार आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे कारण सांगता येईल, असे वनविभागाने म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा-