नाशकात ४ वर्षीय चिमुकल्याला संपवलं, १३ वर्षीय मुलाचं धक्कादाय कृत्य, कारण फक्त इतकंच... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 25, 2022

नाशकात ४ वर्षीय चिमुकल्याला संपवलं, १३ वर्षीय मुलाचं धक्कादाय कृत्य, कारण फक्त इतकंच...

https://ift.tt/EjmXuqh
नाशिक: त्र्यंबक रोडवर असलेल्या एका अनाथ आश्रमातून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी असलेल्या आधारतीर्थ आश्रमामध्ये एका लहान मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी आता संशयित अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. संशयित हा आश्रमातीलच विद्यार्थी असून त्याने चार वर्षीय चिमुकल्याचा किरकोळ वादातून गळा आवळून खून केला आहे. नाशिक शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या त्र्यंबकरोड परिसरातील अंजनेरी भागात हे आधारतीर्थ अनाथ आश्रम आहे. या आश्रमात संपूर्ण राज्यभरातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं राहतात. मात्र, या आश्रमातील एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने आश्रमाच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही घटना उघडकीस येताच याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. हेही वाचा- दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत या प्रकरणाचा तपास केला. यावेळी पोलीस तपासात धक्कादायक बाब उघड झाली. आश्रमातीलच तेरा वर्षीय मुलाने त्या चिमुकल्याची हत्या केल्याची बाब उघडकीस आली. मंगळवारी मध्यरात्री या अल्पवयीन मुलाने चिमुरड्याचा गळा आवळून खून केला. त्याच्या भावासोबत झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून या अल्पवयीन मुलाने चिमुकल्याला संपवलं. आधारतीर्थ आश्रमात मंगळवारी (दि. २२) सकाळी ६ च्या सुमारास चार वर्षीय मुलाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला होता. यानंतर पोलिसांकडून तपास चालू होता. शवविच्छेदन अहवालात आलोकचा गळा आवळून खून झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हेही वाचा- आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला मुलींसाठीच्या त्रंबक रोडवरील आधारतीर्थ आश्रमात अनेक मुले-मुली राहत असतात या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली आहे. मृत चार वर्षीय चिमुरडा आणि त्याचा मोठा भाऊ याच आश्रमात राहतात. आश्रमातीलच नववीतील एका मुलाचे मोठ्या भावाशी भांडण झाले हाेते. त्यातूनच ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर असलेल्या तुपादेवी गावाजवळ अंजनेरी येथे हे आश्रम आहे. या ठिकाणी ही घटना घडली आहे. राज्यातील ज्या शेतकर्‍यांनी आत्महत्या केली आहे, त्यांचे कुटुंब हलाखीच्या परिस्थितीत जीवन व्यतीत करत आहे, अशा राज्यातील सर्व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले या आश्रमात राहतात. आधारतीर्थ आश्रमात घडलेल्या या घटनेने आश्रमातील मुलांमध्ये घबराटीचे वातावरण तयार झाले आहे . चार वर्षाच्या चिमुकल्याचा हत्येनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हेही वाचा-