महाराष्ट्राच्या मंत्र्यांनो कर्नाटकात येऊ नका! सीमाभागात तणाव, २ हजार पोलिसांचा बंदोबस्त - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, December 3, 2022

महाराष्ट्राच्या मंत्र्यांनो कर्नाटकात येऊ नका! सीमाभागात तणाव, २ हजार पोलिसांचा बंदोबस्त

https://ift.tt/D1I6mVL
बेळगाव/कोल्हापूर : एकीकडे जत तालुक्यात पाणी सोडून महाराष्ट्राला डिवचतानाच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील नेत्यांच्या बेळगाव दौऱ्याला विरोध केला आहे. ' आणि महाराष्ट्र राज्यातील परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावला येऊ नये,' असा संदेश कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पाठवला असल्याचे बोम्मई यांनी सांगितले. दरम्यान, चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई या दोन मंत्र्यांचा, आज शनिवारचा बेळगाव दौरा लांबणीवर पडला असून, तो सहा डिसेंबरला होणार आहे. दरम्यान, गनिमी काव्याने एकही नेता बेळगावमध्ये येऊ नये, म्हणून सीमा नाक्यावर दोन हजार कर्नाटक पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात आला आहे. कर्नाटकने गुरुवारी जत तालुक्यातील अनेक गावात पाणि सोडले. तिकोंडी, भिवर्गी, उमदीसह अनेक गावात या पाण्याचे पूजन करून स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राने म्हैसाळ योजनेचे काम तातडीने सुरू करावे, अशी जोरदार मागणी केली. त्यानुसार मुंबईत झालेल्या संयुक्त बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २० जानेवारीपूर्वी या योजनेची निविदा काढण्याचे आदेश दिले. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील व शंभुराज देसाई आज, शनिवारी बेळगाव दौऱ्यावर जाणार होते. मात्र, त्यांचा हा दौरा आता सहा डिसेंबरला होणार आहे. या दिवशी ते सीमाभागातील मराठी बांधवांशी संवाद साधणार आहेत. सीमाभागातील २१ नाक्यांवर बंदोबस्त महाराष्ट्राचा एकही नेता बेळगावमध्ये जाऊ नये, म्हणून कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सीमाभागातील २१ नाक्यांवर दोन हजारो पोलिस तळ ठोकून आहेत. सहा डिसेंबरपर्यंत हा बंदोबस्त कायम राहणार आहे. राज्य राखीव दलाच्या तुकड्या येथे तैनात करण्यात आल्या आहेत. अनेक वरिष्ठ पोलिस अधिकारी येथे आले आहेत. सीमाभागात तणावाचे वातावरण महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांत सध्या भाजपचे सरकार आहे. तरीही सीमानाक्यावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आल्याने सीमाभागातील मराठी बांधवातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या भागात प्रचंड तणावाचे वातावरण आहे, अशी माहिती सीमाभागातील नागरिकांनी दिली. जत तालुक्यातील गावांसाठी महत्त्वाची असणारी म्हैसाळ उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रय़त्न करा. उपसा सिंचन योजना आणि गावागावातील पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी विविध विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी. या कामांसाठी आवश्यक निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री