राज्यावर मोठं संकट! आज पुन्हा कोसळणार अवकाळी पाऊस, थेट 7 जिल्ह्यांमध्ये इशारा, पुढील काही तास धोक्याचे… - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, March 15, 2026

राज्यावर मोठं संकट! आज पुन्हा कोसळणार अवकाळी पाऊस, थेट 7 जिल्ह्यांमध्ये इशारा, पुढील काही तास धोक्याचे…

राज्यावर मोठं संकट! आज पुन्हा कोसळणार अवकाळी पाऊस, थेट 7 जिल्ह्यांमध्ये इशारा, पुढील काही तास धोक्याचे…

राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता बघायला मिळत आहे. मार्च महिन्याला सुरूवात झाली. मात्र, तरीही राज्यातून पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाहीये. नुकताच भारतीय हवामान विभागाने पावसाचा मोठा इशारा दिला. मार्चमध्ये तापमानात वाढ होत असतानाच दुसरीकडे पाऊसही कोसळत आहे. पुढील काही दिवसांसाठी भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिला. राज्यातील अनेक भागात आजही अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. पावसाच्या सतर्कतेचा अलर्ट जारी करण्यात आला. राज्यातील इतर भागात उन्हाचा कडाका कामय असण्याचा अंदाज आहे.

बीड, धाराशिव, चंद्रपूर, गडचिरोली, सांगली, सातारा आणि सोलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. या भागात भारतीय हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला. गेल्या काही महिन्यांपासून सतत पाऊस कोसळताना दिसत आहे. त्यामध्येच आताही पावसाचा इशारा देण्यात आला. निफाड येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. निफाड येथे 13.3 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.

अमरावती येथे देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. अमरावती येथे 41.8 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. काही दिवसांपूर्वीच मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला. ज्याने रब्बीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामध्येच आता पुन्हा एकदा पावसाचा मोठा इशारा देण्यात आला. 20 मार्च 2026 पर्यंत राज्यात पावसाचा मोठा इशारा देण्यात आला.

धुळे जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आहे. सध्याच्या स्थितीत धुळे जिल्ह्यात 39 अंशावर उन्हाचा पारा पोहचला असून यामुळे जनजीवन विस्कळित झाले. या उन्हामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान होत आहे. या उन्हाच्या कडाक्यामुळे धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या शेतातील तब्बल 5 एकरातील टरबूज खराब झाले. प्रचंड उन्हाचा फटका टरबूजांना बसल्यामुळे लाखोंचे नुकसान झाले आहे. टरबूजांना योग्य बाजारभाव मिळाला नाही आणि त्यातच उन्हामुळे संपूर्ण शेतातील टरबूज खराब झाले.