‘काळजीवाहूं’ची काळजी’, फडणवीसांवर हल्लाबोल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 9, 2019

‘काळजीवाहूं’ची काळजी’, फडणवीसांवर हल्लाबोल

https://ift.tt/2NtgO2q
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेने मुखपत्र ‘सामना’च्या अग्रलेखातून पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. ‘विठ्ठला, नक्की काय चुकलं? ‘काळजीवाहूं’ची काळजी’ या मथळ्याखाली लिहिलेल्या अग्रलेखात देवेंद्र फडणवीस यांचा पुन्हा एकदा मावळते मुख्यमंत्री असा उल्लेख करत, काळजीवाहू किती दिवस राहणार? असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. ‘वर्षा’वरील बड्या पोलीस अधिकाऱ्यांना काळजीवाहूंचे राजकीय कार्यकर्ते म्हणून काम करता येणार नाही आणि त्यांनी तसं केल्यास भविष्याचं भान ठेवावं, असा इशाराही शिवसेनेने दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांनी त्यांच्यावर पुढील व्यवस्था होईपर्यंत कामकाज पाहण्याची जबाबदारी दिली. पण याबाबत शिवसेनेने चिंता व्यक्त केली आहे. देवेंद्र फडणवीस काळजीवाहू या बिरुदावलीने वर्षावर थांबतील, पण किती दिवस याचा निर्णय राज्यपालांना घ्यावाच लागेल. त्यांना कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येणार नाही, प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही राज्यनिष्ठेचं भान ठेवावं, असा सल्ला अग्रलेखातून देण्यात आला आहे. वाचा : राज्याची स्थिती अस्थिर आहे, पण ही स्थिती लवकरच स्थिर होईल आणि रयतेचं राज्य येईल. राज्यपाल सर्वात मोठ्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी बोलावू शकतात. त्यामुळे भाजपने ही संधी सोडू नये. सर्वात मोठा पक्ष म्हणून ते पुढाकार घेत नसतील तर तो त्यांचा प्रश्न आहे. शिवसेनेशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही, असं भाजपचे नेते राज्यपालांना भेटून आल्यानंतर सांगतात, पण लोकसभा निवडणुकीच्या अगोदर जे आश्वासन देण्यात आलं होतं, त्याबद्दल शब्दही काढत नाहीत. या बनवाबनवीचा आम्हाला आणि जनतेला वीट आला आहे, असं भाष्य अग्रलेखातून करण्यात आलं आहे. शिवसेना भाजपात तणाव कायम देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिल्यानंतर पुन्हा एकदा सरकार हे भाजपचंच येईल, असंही सांगायला ते विसरले नाहीत. पण यानंतर शिवसेना पक्षप्रमुख यांनी भाजपवर हल्लाबोल केला. ‘मला खोटं ठरवणाऱ्या व्यक्तीशी मी बोलणारच नाही’, अशी भूमिका त्यांनी घेतली. वाचा : राज्यात नव्या समीकरणांची नांदी ? शिवसेना खासदार यांनी राज्यातील परिस्थितीविषयी वारंवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. शुक्रवारी रात्री अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार यांच्याशी चर्चा केली. शिवसेनाही सातत्याने राष्ट्रवादीच्या संपर्कात आहे. त्यामुळे राज्यात नवी समीकरणे उदयास येणार का याकडे लक्ष लागलं आहे.