या नेत्यांचा अजून 'भाजपवर भरवसा हाय का'? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, November 11, 2019

या नेत्यांचा अजून 'भाजपवर भरवसा हाय का'?

https://ift.tt/2pZpHry
मुंबई: शिवसेनेचा पाठिंबा नसल्याने आम्ही सत्ता स्थापनेचा दावा सोडत असल्याचे भारतीय जनता पक्षाने राज्यपालांकडे स्पष्ट केले आहे. या पूर्वी शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. त्यावेळी राज्यात सरकार भारतीय जनता पक्षाच्याच नेतृत्त्वात बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा विश्वास राज्यातील अनेक नेत्यांना वाटत होता. याच कारणामुळे इतर पक्षात चांगल्या पदांवर असलेल्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास ठेवून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मात्र, आता भारतीय जनता पक्षाचे सरकार बनेल असेही वाटत नाही आणि देवेंद्र फडणवीस हे देखील राज्याचे मुख्यमंत्री बनणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर इतर पक्षांमधून भारतीय जनता पक्षात आलेल्या नेत्यांना आपली फसवणूक झाली असल्याचे वाटत आहे. आता राज्यात केवळ भाजप, भाजप आणि भाजपच असेल, असा ज्यांना विश्वास होता त्या नेत्यांनी भाजप-शिवसेनेतील संबंध बिघडण्यापूर्वीच भाजपत गेले. भाजपनेही निवडणुकीपूर्वी पक्षात मेगा भरती केली. या सर्वांच्या पदरात काही ना काही पडण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले होते. यांचे काय होणार? खरे तर सर्वात मोठे संकट कोसळले आहे नवी मुंबईतील गणेश नाईक यांच्या कुटुंबावर. नाईक यांचे संपूर्ण कुटुंब नवी मुंबई महानगर पालिकेती नगरसेवकांसह भाजत गेले आहेत. ही निवडणूक जिंकल्यानंतर आपल्याला मलईदार मंत्रिपद मिळेल असा गणेश नाईक यांना विश्वास होता. मात्र, बदललेल्या परिस्थितीनंतर त्यांचे काय होणार, हा प्रश्न त्यांना पडला आहे. विखे पाटील यांचाही स्वप्नभंग काँग्रेस पक्षाचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद सोडून भाजपत प्रवेश केलेले हे देखील चिंतेत आहेत. जर देवेंद्र फडणवीस बाजूला पडले तर भारतीय जनता पक्षात त्यांना कुणी ओळखणार देखील नाही, अशी त्यांची अवस्था होणार आहे. कृपाशंकर सिंह यांच्यावर कोण करणार कृपा? मुंबईतील उत्तर भारतीयांचे काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंह याचीही स्थिती अशीच आहे. त्यांनी कलम ३७० च्या मुद्याचा आधारे काँग्रेसवर टीका करत भाजपत गेले होते. त्यांनी भारतीय जनता पक्षांच्या उमेदवारांच्या विजयासाठी कंबर कसली. मात्र आता ते काँग्रेसमध्ये असते तर निदान आमदार तरी झाले असते असे त्यांना वाटत आहे. केवळ कृपाशंकर सिंहच नाही, तर भाजपत गेलेले मुंबईतील राजहंस सिंह, चित्रसेन सिंह, रमेशसिंह ठाकूर, जयप्रकाश सिंह हे नेते देखील आता चिंतेत आहेत. आता फडणवीस हेच जर मुख्यमंत्रिपदी नसतील, तर मग या सर्वांना दिलेली आश्वासने पाळणार कोण? हर्षवर्धन यांचे हर्ष लोपले निवडणुकीपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत काँग्रेस नेते यांनी भाजपत प्रवेश केला. आपल्याला मंत्रिपद मिळेल याच आशेने त्यांनी बरोबर निवडणुकीपूर्वी भाजपत प्रवेश केला. मात्र, हर्षवर्धन पाटील हे इंदापूर मतदारसंघातून निवडणूक हारले असून भाजप त्यांना विधान परिषदेवर देखील पाठवू शकणार नाही, अशी स्थिती आहे. मात्र, ते काँग्रेसमध्येच राहिले असते, तर त्यांच्याकडे मोठी जबाबदारी असती हे नक्की. मोहिते पाटीलही चितेंत शरद पवार यांचे अत्यंत जवळचे समजले जाणारे अकलूजचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजीतसिंह मोहिते पाटील यांना विधानसभेनंतर आपले पुनर्वसन होईल असे वाटत होते. एक तर मोहिते पाटील कुटुंबाला ना लोकसभेची उमेदवारी मिळाली, ना विधानसभेची. आता तर त्यांना विधानपरिषद मिळण्याचाही विश्वास राहिलेला नाही. मंत्रिपद तर दूरच राहिले. याबरोबरच त्यांचेस शरद पवार यांच्याशी असलेले संबंधही बिघडले गेले आहेत. कधी चमकणार साताऱ्याचा तारा? राष्ट्रवादीतून भाजपत गेलेले उदयनराजे भोसले यांचा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झाला. आपला विजय होऊन आपण केंद्रात मंत्री बनू या आशेने ते भाजपत दाखल झाले होते. मात्र, आता त्यांच्या हातात खासदारकीही नाही आणि त्यांना काही देईल असा स्थितीतही नाही.