नवी दिल्ली: आज सकाळी आठच्या सुमाराला सूर्यग्रहण सुरू झाले. हे सूर्यग्रहण जगाच्या अधिकाधिक भागात पाहिले गेले असल्याने हे ग्रहण विशेष मानले जात आहे. हे सूर्यग्रहण सर्व आखाती देशांमध्येही पाहिले जात आहे. याखेरीज सर्व आशियाई देश आणि ऑस्ट्रेलियामध्येदेखील हे सूर्यग्रहण पाहायला मिळत आहे. अबू धाबीमध्ये तर सूर्याचे आश्चर्यचकित करणारे रूप पाहिले गेले. यावर्षी (२०१९) तीन सूर्यग्रहणे झाली असून आजचे सूर्यग्रहण हे या वर्षाचे शेवटचे ग्रहण आहे. हे या शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण असल्याचेही सांगितले जात आहे. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, हे जगातील इतर भागांपेक्षा भारतात अधिक स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते. तसेच दक्षिण भारतामध्ये तर या ग्रहणाचे विविध रंग अनुभवण्यास मिळणार आहेत.
आग्निची अंगठी हे सूर्यग्रहण 'रिंग ऑफ फायर' अर्थात आगीचे सुवणकड्याच्या रुपात दिसणार असल्याने लोकांमध्ये उत्साही आहे. दुबईमध्ये पहाटे नऊ वाजण्याच्या सुमारास हे कडे पाहायला मिळाले. रिंग ऑफ फायर, अर्थात आग्निची सुंदर अंगठी कशी बनते? वास्तविक, चंद्र हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये आल्यानंतर केवळ सूर्याच्या कडेची बाजू दिसते. ही स्थिती तयार झाल्यानंतर एक चमकणारे कडे, किंवा अंगठी दिसते. याला रिंग ऑफ फायर असे म्हणतात. जेव्हा पूर्ण सूर्यग्रहण होते तेव्हाच अशी स्थिती तयार होत असते. चंद्राच्या लहान आकारामुळे सूर्य पूर्णपणे लपला जात नाही. आता, पुढील सूर्यग्रहण २१ जून रोजी होणार आहे. २१ जून हा वर्षाचा सर्वात मोठा दिवस आहे. ग्रहण कसे लागते? सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. चंद्र हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यात येतो तेव्हा सूर्यग्रहण लागते. अमावस्येला ही घटना घडते. त्याचप्रमाणे जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या दरम्यान येते तेव्हा चंद्रग्रहण होते. ही घटना पौर्णिमेला घडते. चंद्रग्रहणादरम्यान, समुद्रामध्ये हालचाल देखील वाढते आणि समुद्राला मोठी भरतीही येते.