ध्यानी मनी नसताना टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला या प्रकारात निर्माण झाली पदकाची आशा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, July 31, 2021

ध्यानी मनी नसताना टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला या प्रकारात निर्माण झाली पदकाची आशा

https://ift.tt/3zW82PW
टोकियो: टोकियो ऑलिम्पिकमध्ये नेमबाजी, बॉक्सिंग, तिरंदाजी अशा क्रीडा भारताला पदकाची आशा होती. पण भारतीय खेळाडूंना यश मिळाले नाही. अशात कोणाच्या ध्यानी मनी नसताना अॅथलेटिक्समध्ये पदकाची आशा निर्माण झाली आहे. वाचा- ऑलिम्पिक २०२०च्या आठव्या दिवशी महिलांच्या थाळीफेकमध्ये भारताला आनंदाची बातमी मिळाली. या प्रकारात भारताची अनुभवी सीमा पुनिया आणि युवा या दोघींचा सहभाग होता. थाळी फेरमध्ये जगभरातून ३१ खेळाडू पात्र ठरल्या होत्या. त्यांचे दोन गट करण्यात आले होते. ग्रुप ए मध्ये सीमा तर ग्रुप बी मध्ये कमलप्रीत होती. दोन्ही ग्रुपमधील खेळाडूंना तीन संधी असते आणि त्यातील सर्वोत्तम कामगिरी विचारात घेतली जाते. अंतिम फेरीत अव्वल १२ जण पात्र ठरतात. वाचा- ग्रुप ए मध्ये सीमाने तीन प्रयत्नात ६०.५७ ही सर्वोत्तम कामगिरी केली. ती ग्रुपमध्ये सहाव्या स्थानावर राहिली. तर ग्रुप बी मध्ये कमलप्रीतने ६०.२९, ६३.९७, ६४.०० अशी कामगिरी केली. कमलप्रीतने ग्रुप बी मध्ये दुसरे स्थान मिळवले आणि फायनलचे तिकीट पक्के केले. तर सीमा १६व्या स्थानावर राहिली. समीचे हे चौथे ऑलिम्पिक होते. तर कमलप्रीत प्रथमच ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलाय. तिच्या नावावर ६५.०५ हा राष्ट्रीय विक्रम देखील आहे. तर इंडियन ग्रँड पिक्स ४ मध्ये तिने ६६.५९ अशी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. कमलप्रीत ही भारताची पहिली थाळी फेकपटू आहे जिने ६५ मीटर पेक्षा अधिक लांब थाळी फेकली आहे.