...तर कंगना राणवतवर अटक वॉरंट; हायकोर्टाचा इशारा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, September 15, 2021

...तर कंगना राणवतवर अटक वॉरंट; हायकोर्टाचा इशारा

https://ift.tt/3hwnCuA
म. टा. विशेष प्रतिनिधी, गीतकार जावेद अख्तर यांच्या कथित बदनामीविषयीच्या खटल्याच्या सुनावणीसाठी हजर राहण्याचे न्यायालयाचे निर्देश असतानाही मंगळवारी पुन्हा एकदा गैरहजर राहिली. प्रकृती अस्वास्थ्य व करोनाच्या लक्षणांच्या अनुषंगाने वैद्यकीय चाचणी करायची असल्याचे कारण तिने दिले. त्यामुळे अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने कंगनाला पुन्हा एकदा आणखी एक शेवटची संधी देत २० सप्टेंबरच्या सुनावणीला हजर न राहिल्यास अटक वॉरंट काढण्याचा इशाराही दिला. 'अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर रिपब्लिक टीव्हीवर या वाहिनीचे मुख्य संपादक अर्णव गोस्वामी यांनी घेतलेल्या मुलाखतीत कंगनाने माझ्याविरोधात बिनबुडाचे आरोप करून माझी नाहक बदनामी केली', अशी तक्रार अख्तर यांनी अॅड. जय भारद्वाज यांच्यामार्फत केली आहे. याविषयी पोलिसांच्या अहवालाची दखल घेऊन न्यायालयाने कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, वारंवार नोटीस देऊनही कंगना न्यायालयात हजर राहिली नाही. त्यामुळे महानगर न्यायदंडाधिकारी आर. आर. खान यांनी कंगनाला अखेरची संधी देत पुढील सुनावणीसाठी हजर राहण्याचे निर्देश मागील सुनावणीत दिले होते. शिवाय कंगना पुन्हा गैरहजर राहिल्यास तिच्याविरोधात वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुभा अख्तर यांना दिली होती. यादरम्यान, अंधेरी न्यायालयातील या कायदेशीर कार्यवाहीच्या वैधतेलाच आव्हान देणारा कंगनाचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयानेही ९ सप्टेंबर रोजी फेटाळून लावला. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी न्या. खान यांच्यासमोर सुनावणी होणार होती. त्यासाठी जावेद अख्तर व त्यांची पत्नी अभिनेत्री शबाना आझमी हे दोघे न्यायालयात उपस्थित होते. मात्र, कंगना गैरहजर राहिली. 'मागील काही दिवसांत कंगना तिच्या आगामी चित्रपटाची प्रसिद्धी करण्याच्या कामात व्यग्र होती. या दरम्यान तिची प्रकृती बिघडली असून करोनाची लक्षणे दिसत आहेत. त्यामुळे वैद्यकीय चाचणी करायची आहे. म्हणून ती न्यायालयात हजर राहू शकली नाही', असे सांगत कंगनाचे वकील अॅड. रिझवान सिद्दिकी यांनी तिच्या प्रकृती अस्वास्थ्याविषयीचे डॉक्टरांचे प्रमाणपत्र दाखवले. 'हा सर्व प्रकार कायदेशीर कार्यवाही लांबवण्याचा आहे. यापूर्वीही कंगनाने न्यायालयाच्या नोटिसांना न जुमानता हजेरी टाळली. त्यामुळे ती पुन्हा गैरहजर राहिल्यास न्यायालयाने तिच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढणे आवश्यक आहे', असे म्हणणे अख्तर यांच्यातर्फे यांनी भारद्वाज यांनी मांडले. अखेरीस दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी कंगनाच्या या गैरहजेरीविषयी मुभा देतानाच २० सप्टेंबरच्या पुढील सुनावणीला तिला हजर राहण्याचे निर्देश दिले. तसेच त्या सुनावणीला गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट काढण्याचा इशाराही कंगनाला दिला.