Captaincy : विराट कोहलीने कोणत्या पाच कारणांमुळे सोडलं कर्णधारपद, जाणून घ्या... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 17, 2021

Captaincy : विराट कोहलीने कोणत्या पाच कारणांमुळे सोडलं कर्णधारपद, जाणून घ्या...

https://ift.tt/3tJGZFw
नवी दिल्ली : विराट कोहलीने आज भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली. पण कोहलीने हे कर्णधारपद का सोडण्याचे ठरवले, याची पाच कारणं आता समोर आली आहेत. पहिलं कारण...रोहित शर्माकडून विराटला कर्णधारपदासाठी कडवे आव्हान मिळत आहे. रोहितने आतापर्यंत पाचवेळी आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. आयपीएलच्या कामगिरीवर भारताच्या संघाची निवड केली जाते, मग रोहितकडे ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद का नाही, असा प्रश्न वारंवार विचारला जात होता. त्याचबरोबर रोहित तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये दमदार फलंदाजी करत आहे. त्याचबरोबर ट्वेन्टी-२० क्रिकेटचा चांगला अनुभव त्याच्या गाठिशी आहे. त्यामुळे विराटने ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला असावा, असे समोर येत आहे. दुसरं कारण...विराट कोहली हा २०१५ ते २०१९ या कालावधीत चांगल्या फॉर्ममध्ये होता. पण २०२० सालानंतर मात्र विराट चांगल्या फॉर्मा नसल्याचे सर्वांनीच पाहिले आहे. कारण गेल्या जवळपास दीड वर्षात विराटला एकही शतक झळकावता आलेले नाही. त्याचबरोबर ट्वेन्टी-२० संघावरची त्याची पकडही ढिली होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याचबरोबर विराटविनादेखील भारतीय संघ जिंकू शकतो, हे सर्वांनाच कळून चुकले आहे. तिसरं कारण...विराट कोहली हा सातत्याने ८-९ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतोय आणि ५-६ वर्षे तिन्ही प्रकारच्या संघाचे कर्णधारपदही भूषवतो आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दडपण पाहता कोहलीने हा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने कर्णधारपद सांभाळणं हे सोपं काम नाही, त्यामुळेच वर्कलोडचे कारण देत कोहलीने हा निर्णय घेतला आहे. चौथं कारण...आयसीसीच्या महत्वाच्या स्पर्धांबरोबर आयपीएलमध्येही कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाला एकदाही जेतेपद पटकावता आलेले नाही. कोहलीच्या नेतृत्वाखाली संघ बाद फेरीत पोहोचतो, पण त्याला संघाला जेतेपद पटकावून देता येत नाही, हे आतापर्यंत पाहायला मिळाले आहे. त्यामुळेच कोहलीने हा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे. पाचवं कारण...ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा भारताने सामना जिंकला तेव्हा कोहलीला त्याचे श्रेय देण्यात आले नाही. समालोचक आणि तज्ञ मंडळींनी संघातील खेळाडूंसहीत राखीव फळीला श्रेय दिले, पण कोहलीला मात्र दिले नाही. त्यामुळे ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचे कोहलीचे हेदेखील एक कारण असू शकते, असे म्हटले जात आहे.