GT vs MI क्वॉलिफायल २ लढतीचे एक्स फॅक्टर; हे पाच खेळाडू ठरवणार मॅचचा निकाल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 26, 2023

GT vs MI क्वॉलिफायल २ लढतीचे एक्स फॅक्टर; हे पाच खेळाडू ठरवणार मॅचचा निकाल

https://ift.tt/yLF8YpX
अहमदाबाद: गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मधील क्वॉलिफायर २ ची लढत होणार आहे. या मॅचमधील विजेत्या संघाला फायनलचे तिकिट मिळेल आणि पराभूत संघाचे आव्हान संपुष्ठात येईल. विजेता संघ २८ मे रोजी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध जेतेपदासाठी लढेल.हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने हंगामात धमाकेदार कामगिरी केली. गुणतक्त्यात ते पहिल्या स्थानाव होते. पण क्वॉलिफायर १ च्या लढतीत चेन्नईने त्यांना पराभवाचा धक्का दिला. गुजरातच्या संघात मॅच जिंकून देणारे एकापेक्षा एक खेळाडू आहेत. दुसऱ्या बाजूला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाली. पण नंतर त्यांनी शानदार कामगिरी करून प्लेऑफचे तिकीट मिळवले. आता क्वॉलिफायर दोन्ही संघाचे खेळाडू अव्वल कामगिरी करण्याची संधी सोडणार नाहीत. चाहत्यांना देखील या लढतीत चांगली कामगिरी पाहण्याची संधी मिळू शकते. नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत असेच पाच खेळाडू आहेत जे मॅचचा निकाल बदलू शकतात. १) शुभमन गिल- गुजरातचा सलामीवीर हा या हंगामातील सर्वात धोकादायक फलंदाज ठरला आहे. त्याने सातत्याने धावा केल्या आहेत. आयपीएलच्या १६व्या हंगामातील १५ सामन्यात त्याने १४९.१७च्या स्ट्राइक रेटने आणि ५५.५४च्या सरासरीने ७२२ धावा केल्या आहेत. यात सलग दोन शतकांचा देखील समावेश आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या लढतीत तो गुजरातच्या विजयाचा हुकमी एक्का ठरू शकतो. २) सूर्यकुमार यादव- आयपीएल २०२३च्या सुरुवातीला सूर्याचा फॉर्म अतिशय खराब होता. पण दुसऱ्या टप्प्यात मात्र त्याच्या बॅट तळपली. चार अर्धशतक आणि १ शतकासह त्याने १५ सामन्यात ४१.८५च्या सरासरीने ५४४ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १८३.७८ इतका आहे. मिस्टर ३६० डिग्री अशी ओळख असलेल्या या खेळाडूकडून गुजरातविरुद्ध वादळी खेळी पहायला मिळू शकते. ३) मोहम्मद शमी- गुजरात संघाच्या आक्रमणाची धार मोहम्मद शमी आहे. त्याने या हंगामात २६ विकेट घेतल्या आहेत. त्याची सरासीर १७.३८ तर इकॉनॉमी ७.६६ अशी शानदार आहे. शमीच्या माऱ्यापुढे मुंबईला सावध रहावे लागले. ४) राशिद खान- करामती खान अशी ओळक असलेल्या राशिदने या हंगामात २५ विकेट घेतल्या आहेत. त्याची सरासरी १९ तर इकॉनॉमी ७.९२ अशी आहे. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. या हंगामात एका हॅटट्रिक देखील त्याने घेतली आहे. त्याच बरोबर अखेरच्या षटकात तो चौकार षटकारांचा पाऊस देखील पाडू शकतो. ५) आकाश मढवाल- मुंबई संघाला या हंगामात सापडलेला हिरा म्हणजे आकाश होय. घातक गोलंदाजीच्या जोरावर त्याने एलिमिनेटर सामन्यात लखनौ संघाची दाणादाण उडवली. त्याने फक्त ५ धावा देत ५ विकेट घेतल्या. जोफ्रा आर्चरच्या जागी घेतलेल्या या खेळाडूने संघाला निराश केले नाही. ७ सामन्यात त्याच्या नावावर १३ विकेट झाल्या आहेत. गुजरातविरुद्ध रोहित शर्माचे हे मुख्य अस्त्र असेल.