ठाणे: शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून पसरलेल्या दुर्गंधीमुळं नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. याबाबत सोशल मीडियावर तक्रारी पाऊस पडत आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी मात्र कानावर हात ठेवत महापालिकेकडं बोट दाखवलं आहे. डोंबिवली एमआयडीसी परिसरातील नाल्यातून वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे शहरात पसरत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. मागील आठ दिवसापासून रोज सकाळी नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतो. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे कानावर हात ठेवले आहेत. महापालिकेकडून खाडीत सोडल्या जाणाऱ्या घरगुती सांडपाण्यामुळे थंडीच्या काळात सकाळच्या वेळी दुर्गधी पसरत असल्याचं मंडळानं म्हटलं आहे. मात्र, थंडीमुळे दुर्गंधी वाढत असेल तर मागील दोन वर्षांत इतका त्रास का नव्हता, असा सवाल त्रस्त नागरिकाककडून केला जात आहे.
https://ift.tt/2PzypFO