मुंबई: आगामी वर्षातील श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ (IND vs SL) जाहीर करण्यात आला आहे. ३ जानेवारीपासून भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. तर १० जानेवारीपासून वनडे मालिका खेळवली जाणार आहे. बांगलादेश दौऱ्यावर कर्णधार रोहित शर्मा जखमी झाला होता. यामुळे तो टी-२० मालिकेत भाग घेणार नाही. त्याच्या जागी हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करेल. रोहित वनडे मालिकेतून मैदानात परतणार आहे. पण या टीम सिलेक्शनमध्ये ५ खास गोष्टी होत्या, ज्यांच्यामुळे संघात मोठा बदल पाहायला मिळत आहे. पाहूया या ५ कोणत्या गोष्टी आहेत. वाचा: हार्दिक एकदिवसीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या टी-२० संघाची कमान सांभाळणार याबाबत काही शंका नव्हती, पण हार्दिकसाठी सर्वात मोठी गोष्ट ठरली, ती म्हणजे हार्दिक पांड्याला भारतीय वनडे संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. केएल राहुलच्या जागी तो रोहित शर्माचा उपकर्णधार असेल. बीसीसीआय हार्दिककडे भावी कर्णधार म्हणून पाहत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातने आयपीएलचा शेवटचा हंगाम जिंकला होता. तेव्हापासून तो कर्णधारपदाच्या दाव्यात सर्वात पुढे होता. हेही वाचा: धवनच्या कारकीर्दवर प्रश्नचिन्ह शिखर धवनकडे भारताच्या वनडे संघाचे नेतृत्त्व होते, तो भारताकडून फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळायचा. मात्र त्याला या संघातूनही आता वगळण्यात आले आहे. शुभमन गिलने सलामीवीर म्हणून उत्तम खेळ दाखवला. यासह ईशान किशनने बांगलादेशविरुद्ध द्विशतक झळकावले. दुसरीकडे, धवनने २०१९ नंतर एकही शतक झळकावलेले नाही. त्याचा स्ट्राइक रेट ८० च्या खाली गेला होता. आता त्याला पुन्हा भारताकडून खेळण्याची संधी मिळणार कि नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. वाचा: सूर्यकुमारकडे टी-२० चे उपकर्णधार पद जगातील नंबर अव्वल क्रमांकाचा टी-२० फलंदाज सूर्यकुमार यादवला टीम इंडियाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. रणजीमध्ये मुंबईचे कर्णधारपद भूषवणाऱ्या सूर्याचा टी-२० मध्ये कोणताही संबंध नव्हता. पण या फॉरमॅटमध्ये तो भारतातील तसेच जगातील सर्वात धोकादायक फलंदाज म्हणून उदयास आला आहे. आता त्याला ही नवी जबाबदारी मिळाली आहे. हेही वाचा: वनडे - टी-२० संघातून पंतला आऊट भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला एकदिवसीय आणि टी-२० संघातून वगळण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात शतक झळकावल्यापासून पंत पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये सातत्याने फ्लॉप ठरला आहे. सलामीवीर म्हणून त्याला टी-२० मध्येही संधी देण्यात आली होती, पण त्याच्याकडून फारशी कामगिरी पाहायला मिळाली नाही. आता त्याला एकदिवसीय आणि टी-२० या दोन्ही संघातून वगळण्यात आले आहे. वाचा: टी-२० मध्ये दोन नवीन वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आणि शिवम मावी या दोन युवा वेगवान गोलंदाजांना टी-२० संघात स्थान मिळाले आहे. दोघेही पहिल्यांदाच टी-२० संघाचा भाग बनले आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये मावी उत्तर प्रदेशकडून आणि मुकेश बंगालकडून खेळतो. याशिवाय उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग हे देखील टी-२० संघात आहेत. टीम इंडिया टी-२० संघामध्ये युवा बॉलिंग लाइनअप तयार करण्यावर भर देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
https://ift.tt/I4cgHmo